loader
Breaking News
Breaking News
Foto

तिलारी धरणाच्या पातळीत वाढ; धरणाचे अतिरिक्त पाणी शुक्रवारी नदी पात्रात सोडण्यात येणार; नदी किनारी गावांना सावधानतेचा इशारा;

दोडामार्ग(प्रतिनिधी)- महाराष्ट्र-गोवा या दोन राज्यांचा संयुक्त प्रकल्प असलेल्या तिलारी धरणाच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. यामुळे धरणातील अतिरिक्त पाणी कोनाळ पुच्छ कालवा सांडव्यातून तिलारी नदी पात्रात सोडले जाणार आहे. तेव्हा नदी काठच्या गावातील ग्रामस्थ यांनी खबरदारी घ्यावी. कपडे धुण्यासाठी, आंघोळीसाठी, किंवा गुरे घेऊन जाण्याचा प्रयत्न करू नये, असे आवाहन जलसंपदा विभाग तिलारी उपविभागीय अधिकारी गजानन बुचडे यांनी एका प्रसिद्ध पत्रकाध्दारे कळविले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

तिलारी धरणाच्या परिसरात २०/०७/२०२६ पासून तिलारी धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये अती पर्जन्य वृष्टीमुळे धरणाच्या पाणीसाठ्यात वेगाने वाढ होत आहे. धरणाच्या आरओएस व जीओएस नुसार, धरणक्षेत्रातील पाणलोट क्षेत्रामधून येणारे अतिरिक्त पाणी नियंत्रित पद्धतीने पुच्छ कालव्याद्वारे तिलारी नदीत सोडण्याचे नियोजन आहे. त्या अनुषंगाने दि. २४/०७/२०२६ रोजी खळग्यातील दगडी धरणाच्या सांडव्यावरून अतिरिक्त पाणी नियंत्रित पद्धतीने पुच्छ कालव्याद्वारे तिलारी नदीत सोडण्यात येणार असल्याने, तसेच सद्यस्थितीत धरणाच्या परीसरात पावसाचे प्रमाण वाढले असल्याने, धरणक्षेत्रा बाहेरील पाणलोट क्षेत्र, खरारी नाल्यातील पाणी नदीपात्रात येवून, नदी पात्राची पाणीपातळी वाढण्याची शक्यता आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg