loader
Breaking News
Breaking News
Foto

मोठी बातमी: सोनम वांगचुक यांनी उपोषण घेतलं मागे; केंद्र सरकारकडून 3 अटी मान्य, जेपी नड्डा यांनी रुग्णालयात सगळं वाचून दाखवलं!

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मध्यरात्री 12 वाजण्याच्या सुमारास एक व्हिडीओ शेअर करून दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आणि मंत्रिमंडळात मोठा निर्णय घेण्याचे आश्वासन दिले. यानंतर तर काही मिनिटांनंतरच सोनम वांगचुक यांनी आपले उपोषण संपवले. नीट पेपरफुटी प्रकरणातील दोषींविरुद्ध आंदोलन करणाऱ्या सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी जवळपास 26 दिवसांनंतर आपले उपोषण मागे घेण्याचा निर्णय घेतला. केंद्रीय आरोग्य मंत्री जे. पी. नड्डा आणि केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर सोनम वांगचुक यांनी उपोषण थांबवण्याचा निर्णय जाहीर केला. उपोषण थांबवण्याची माहिती स्वत: सोनम वांगचुक यांनी एक्सवर पोस्ट करत दिली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा आणि डॉ. जितेंद्र सिंह, तसेच लेह-लडाखच्या सर्वोच्च समितीच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत, मी 26 दिवसांनंतर अखेर माझे उपोषण सोडले. यापूर्वी, विविध राजकीय पक्षांच्या 65 खासदारांनी माझी भेट घेतली होती किंवा मला पत्र लिहून उपोषण सोडण्याची विनंती केली होती. केंद्र सरकारसोबत अनेक अटींवर दीर्घ चर्चा केल्यानंतर आणि देशातील संभाव्य हिंसाचाराची शक्यता लक्षात घेऊन हे पाऊल उचलण्यात आले आहे. मी लवकरच एका वेगळ्या व्हिडीओमध्ये या अटींबद्दल सविस्तर माहिती देईन. यादरम्यान, मी तुम्हा सर्वांना अत्यंत सतर्क राहण्याचे आणि कुठेही होणारी हिंसा टाळण्याचे आवाहन करतो, असं सोनम वांगचुक यांनी सांगितले.

टाईम्स स्पेशल

1. 20 जुलै रोजी शांततेने आंदोलन करून संसदेवर मोर्चा काढणाऱ्या विद्यार्थ्यांवर कोणताही गुन्हा दाखल केला जाणार नाही. 2. परीक्षेसंदर्भात पेपरफुटी आणि शिक्षण प्रणालीतील सुधारणांवर संसदेत चर्चा करण्यास सरकार तयार आहे. 3. नीट (NEET) पेपरफुटीमुळे आत्महत्या केलेल्या मुलांच्या कुटुंबीयांना नुकसान भरपाई देण्याचाही विचार केला जाईल. केंद्रीय आरोग्य मंत्री जे. पी. नड्डा आणि केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी रुग्णालयात जाऊन सोनम वांगचुक यांची भेट घेतल्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे, जंतरमंतर येथे जवळपास महिनाभर आंदोलन करणाऱ्या सोनम वांगचुक यांच्या समर्थकांशी सरकारची अनेकदा चर्चा होऊनही त्यातून कोणताही तोडगा निघाला नव्हता. मात्र, आंदोलकांवर कोणतीही दंडात्मक कारवाई केली जाणार नाही, अशा आश्वासनांसह करण्यात आलेल्या एका पुढाकारानंतर वांगचुक यांनी आपले उपोषण मागे घेण्याचा निर्णय घेतल्याचे मानले जात आहे. तसेच केंद्र सरकारसोबत अनेक अटींवर दीर्घ चर्चा केल्यानंतर सोनम वांगचुक यांनी आपलं उपोषण थांबवण्याचा निर्णय घेतला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg