loader
Breaking News
Breaking News
Foto

आता सीजेपी पुढे काय करणार ? आम्ही पुढच्या काही दिवसांत सरकारला ........

नवी दिल्ली : नीट परीक्षेतील घोटाळ्यामुळे सीजेपीचे आंदोलन पेटले होते. या आंदोलनाला लाखों भारतीयांनी पाठिंबा दिला होता. आता सीजेपी पुढे काय करणार, असे विचारले जात आहे. याबाबतही सीजेपीच्या प्रवक्त्यांनी सांगितले आहे. सरकारने सर्व मागण्या मान्य केलेल्या असल्या तरी या मागण्यांचा पाठपुरावा केला जाईल, असे सीजेपीने सांगितले आहे. आम्हाला शिक्षणव्यवस्थेत सुधारणा हवी आहे. त्यासाठी आम्ही पुढच्या काही दिवसांत सरकारला एक ड्राफ्ट पाठवणार आहोत. या ड्राफ्टवर सरकार विचार करणार आहे, असे सीजेपीचे प्रवक्ते आशुतोष रांका यांनी सांगितले.तसेच, सरकारने आंदोलकांवरील एफआयआर मागे घेतले जातील, अशी घोषणा केलेली आहे. परंतु सरकारने घेतलेल्या या निर्णयाच्या १५ ते २० कॉपीज आम्हाला सरकार देणार आहे. तीन ते चार दिवसात या निर्णयाची कॉपी मिळेल. याचाही आम्ही अभ्यास करू, असं सीजेपीने सांगितलं आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

भारत सरकार आणि सीजेपीने घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत सीजेपीने आमच्या सगळ्या मागण्या मान्य झाल्या आहेत, असे सांगितले आहे. तसेच नीट पेपरफुटीमुळे ज्या विद्यार्थ्यांनी आपलं आयुष्य संपवलं त्यांच्या कुटुंबीयांना आम्ही शासकीय नियमानुसार आर्थिक मदत देऊ, असेही सरकारने सांगितले. त्यामुळे आता जंतर मंतरवरील सीजेपीचे आंदोलन आता संपले आहे. सर्व आंदोलक आता आपापल्या घरी जाणार आहेत.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg