रत्नागिरी (वार्ताहर) : पतितपावन मंदिर सावरकर यांनी बांधल्याचा चुकीचा इतिहास पाठ्यपुस्तक मंडळ महाराष्ट्र सरकारचे शिक्षण मंत्रालय विद्यार्थ्यांना शिकवत असून खरा इतिहास मिटविण्याचे षडयंत्र सरकारच्या माध्यमातून केले जात आहे. हा खोटा इतिहास तात्काळ बदलण्यात यावा, अन्यथा प्रजासत्ताक दिनी उपोषण करण्यात येईल, असा इशारा देणारे निवेदन रत्नागिरी तालुका भंडारी समाज संघाच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयात देण्यात आले आहे.
महाराष्ट्र शासनाने इंग्रजी व मराठी माध्यमात्रा इयत्ता ८ वी च्या इतिहासाच्या पुस्तकामध्ये पान क्र. २४ वर वि. दा. सावरकर यांनी पतितपावन मंदिर बांधले अशा स्वरुपाचा खोटा इतिहास पाठ्यपुस्तकात समाविष्ट केला आहे. वास्तविक देशातील पहिले प्रतितपावन मंदिर दानशूर श्रीमान भागोजीशेठ कीर यांनी स्वखर्चाने बांधले आहे. तसा शिलालेख १९३१ साली पतितपावन मंदिराच्या प्रवेशद्वारच्या कमानीवर आहे, त्याची छायांकीत प्रत सोबत जोडाली आहे.
याबाबतचे निवेदन दिनांक ३०/११/२०२३ रोजी महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व तत्कालीन शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांना देण्यात आले होते. मात्र अद्यापपर्यंत कोणतीही सुधारणा करण्यात आलेली नाही. यावर तत्काळ कार्यवाही करण्यात यावी यासाठी रविवार दि. २६ जानेवारी २०२५ रोजी रत्नागिरी तालुका भंडारी समाज संघ व समविचारी संस्था यांच्यामार्फत लाक्षणीक उपोषण करण्यात येणार असल्याचे या निवेदनात म्हटले आहे.
3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.