पालकमंत्री पदाच्या निवडी ३७ जिल्ह्यात झाल्या आहेत. आता या पालकमंत्री पदावरुन महायुतीमध्ये धुसफूस सुरु झाली आहे. काही मंत्री नाराज आहेत तर काही आमदार थेट वरिष्ठांकडे आपले मत नोंदवत आहेत. शिवसेना व राष्ट्रवादी या दोन पक्षांमध्ये पालकमंत्री पदावरुन धुसफूस सुरु आहे. अनेक पालकमंत्र्यांना स्वजिल्हे किंवा जवळचे जिल्हे मिळाले नाहीत. त्यामुळे मंत्र्यांमध्ये नाराजीचा सूर आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वतःसाठी आणि सुनिल तटकरे यांनी लेकीपुरते पाहिले, असा सूर व्यक्त होत आहे.
मंत्र्यांना दूरच्या जिल्ह्याचे पालकमंत्रीपद देताना राष्ट्रवादीच्या नऊ मंत्र्यांना पालकमंत्रीपद दूरचे मिळाले आहे. कोल्हापूरचे मुश्रीफ-वाशीम जिल्हा, सातार्याचे पाटील-बुलढाणा जिल्हा, नाशिकच्या झिरवाळे यांना हिंगोली, लातूरच्या बाबासाहेबांना गोंदिया असे पालकमंत्रीपद वाटप करण्यात आले आहे. ज्या नेत्यांना वचन देण्यात आले होते त्यांना पालकमंत्रीपद देण्यात आले नाही, असे अनेक आमदार महायुतीत आहेत. त्यामुळे त्यांची धूसफूस वाढली आहे. खासदार तटकरे आणि मंत्री अजितदादा यांना पालकमंत्रीपदाच्या निवडीबाबत पक्षातीलच नेत्यांनी घेरण्यास सुरुवात केली आहे तर माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही पालकमंत्री पदाबाबत वाटपात समाधान व्यक्त केलेले नाही. त्यांच्या पक्षाच्या आमदारांना योग्य तो जिल्हा मिळालेला नाही. त्यामुळे शिंदे नाराज आणि पवार नाराज.. महायुतीत नाराजीचे सूर असल्याचे म्हटले जात आहे.
3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.