जनता दल युनायटेड (जेडीयू) ने मणिपूरमधील भाजपच्या नेतृत्वाखालील सरकारचा पाठिंबा काढून घेतला आहे. जनता दल युनायटेडने मणिपूर सरकारला दिलेला पाठिंबा औपचारिकपणे काढून घेतला आहे. आता राज्य विधानसभेतील एकमेव जेडीयू आमदार विरोधी बाकावर बसतील. 2022 पासून राज्यात जेडीयूची भाजपसोबत युती होती. आता जेडीयूने सत्ताधारी सरकारचा पाठिंबा काढून घेतला आहे. त्यामुळे राजकारणात खळबळ उडाली आहे.
दरम्यान बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील जनता दल (युनायटेड) ने मणिपूर सरकारला दिलेला पाठिंबा काढून घेतला आहे. मणिपूरमध्ये मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे सरकार आहे. जेडीयूने पाठिंबा काढून घेतला असला तरी बिरेन सिंह यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारच्या स्थिरतेवर कोणताही परिणाम होणार नाही. दरम्यान, भाजपचे येथे 32 उमेदवार आहेत तर जेडीयूचे 6 उमेदवार होते.
टाइम्स स्पेशल
याचे राजकीय परिणाम केंद्रात उमटणार असल्याचे विरोधकांचे म्हणणे आहे.
3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.