loader
Breaking News
Breaking News
Foto

राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी योगेश कदम यांच्या विरोधात निवडणुकीत काम केले ,शिवसेना नेते रामदासभाई यांच्या आरोपाने राजकीय खळबळ

विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेना नेते रामदास कदम यांनी अजित पवार गटातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर गंभीर आरोप केले आहेत. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी योगेश कदम यांच्या विरोधात निवडणुकीत काम केल्याचा गंभीर आरोप कदम यांनी केला आहे. त्यामुळे आता अजित पवार गट यावर काय भाष्य करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

विधानसभेच्या निवडणुका संपल्या असल्या तरी या निवडणुकीत मित्र पक्षांनी काही ठिकाणी घेतलेल्या असहकार्यावरूनची धुसफूस अजूनही सुरूच आहे. आता यात शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी उडी घेतली आहे. अजितदादा गटाच्या राष्ट्रवादीच्या 90 टक्के कार्यकर्त्यांनी निवडणुकीत योगेश कदम यांचं कामच केलं नाही, असा गंभीर आरोप रामदास कदम यांनी केला आहे. तसेच याबाबतची लेखी तक्रार देणार असल्याचंही रामदास कदम यांनी म्हटलं आहे. त्यामुळे निवडणुकीच्या मुद्द्यावरून शिंदे आणि अजितदादा गटात आगामी काळात चांगलीच जुंपण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

टाइम्स स्पेशल

टाइम्स स्पेशल

शिवसेना नेते रामदास कदम यांनी मीडियाशी संवाद साधताना ही प्रतिक्रिया व्यक्त आहे. विधानसभा निवडणुकीवेळी अनेकजणांनी राष्ट्रवादी सोडली आणि उबाठाचं काम केलं. राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे यांचा उजवा हात असलेल्यांच्या गावात योगेश कदमला मते मिळाली नाही. याची माहिती मी सुनील तटकरे यांना देणार आहे. पण आमचे तटकरेंसोबत मतभेद नाही. आमची नाराजी नाही. योगेश कदमला पाडावं, असं सुनील तटकरेंच्या मनात असं कधी येणार नाही. कधीच त्यांच्या मनात असं येणार नाही. पण त्यांच्या कार्यकर्त्यांनी मग मंडणगडचा तालुका प्रमुख असो, दापोलीचा तालुका प्रमुख असो यांनी योगेशसाठी कम केलं नाही. आज आणखी बोलायचं नाही. पण राष्ट्रवादीच्या 90 टक्के लोकांनी योगेश कदम यांचं काम केलं नाही. याबाबत मी लेखी तक्रार तटकरेंकडे करणार आहे. त्यांनी दखल घ्यावी, असं रामदास कदम म्हणाले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts