loader
Breaking News
Breaking News
Foto

हा संघाचा संविधानावर हल्ला! खा.राहुल गांधींनी तोफ डागली

नवी दिल्ली, 4 एप्रिल :- वक्फ सुधारणा विधेयक हे मुस्लिमांना मुख्य धारेपासून बाजूला सारण्यासाठी, त्यांचे वैयक्तिक फायदे, मालमत्ता, अधिकार हिरावून घेण्याचं हे एक शस्त्र आहे. हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भारतीय जनता पार्टी आणि त्यांच्या सहकार्‍यांनी संविधानावर केलेला हल्ला आहे. मुस्लिमांना लक्ष्य करत त्यांनी थेट राज्यघटनेवर हल्ला केला आहे. हे लोक भविष्यात इतर समुदायांना देखील लक्ष्य करू शकतात. काँग्रेस पक्ष या कायद्याचा तीव्र विरोध करत आहे. कारण हे विधेयक भारताच्या मूळ संकल्पनेवर हल्ला करतं आणि धार्मिक स्वातंत्र्याच्या अधिकाराच्या कलम 25 चं उल्लंघन करतं, अशी टीका लोकसभेतील विरोधी पक्षनेते खा. राहुल गांधी यांनी केली आहे. एक्स या सोशल मिडियावर वक्फ बोर्डासंदर्भात त्यांनी आपली प्रतिक्रिया नोंदविली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

राहुल गांधी यांनी म्हटले आहे की, हे विधेयक म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपाने देशाच्या संविधानात केलेला मोठा हल्ला आहे. आज मुस्लिम बांधवांनी असा हल्ला झाला आहे. भविष्यात ते इतर समुदायांनाही लक्ष्य करू शकतात. काँग्रेस पक्षा अशा गोष्टींना तीव्र विरोध करेल असा इशारा राहुल गांधी यांनी दिला आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg