loader
Breaking News
Breaking News
Foto

परिवहन विभागाच्या जमीनीवरील अतिक्रमण हटविण्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे निर्देश ---

ठाणे (प्रतिनिधी)- राज्यभरात परिवहन विभागाच्या जिथे, जिथे जमिनी आहेत, त्या बहुतेक जमिनीवर अतिक्रमण झाले आहे. ते अतिक्रमण काढून टाकून, तेथे कुंपण भिंत घालावी, तसेच नामफलक लावण्यात यावा. असे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी परिवहन विभागाला दिले आहेत. ते परिवहन आयुक्त कार्यालयात बोलावलेल्या परिवहन विभागाच्या आढावा बैठकीमध्ये बोलत होते. यावेळी परिवहन आयुक्त विवेक भीमनवार व सर्व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. यावेळी बोलताना मंत्री सरनाईक म्हणाले की, राज्यभरात ठीक ठिकाणी परिवहन विभागाची जमीन आहे. त्या जमिनीवर कित्येक वर्षापासून अनधिकृत अतिक्रमण झालेले दिसून येते. याबाबत स्थानिक अधिकार्‍यांनी सर्वेक्षण करून सदर जमिनी अतिक्रमण मुक्त करुन आपल्या ताब्यात घ्याव्यात. तेथे कुंपण भिंत करावी तसेच आपल्या विभागाचा नाम फलक प्रदर्शित करावा व यापुढे त्या ठिकाणी अतिक्रमण होणार नाही याची दक्षता घ्यावी.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या बैठकीमध्ये अधिकार्‍यांच्या कार्याचे मूल्यमापन करणे, अकार्यकारी पदाची निर्मिती करणे, वायु वेग पथकाचा दैनंदिन अहवाल मागून घेणे, मोटार वाहन अधिकार्‍यांच्या पदनामासह कर्तव्य व जबाबदारी निश्चित करणे, विधि व सल्लागार पदाची निर्मिती करणे, महसूल वाढवणे अशा विविध विषयावर चर्चा करण्यात आली. परिवहन विभागाच्या बदल्यांमध्ये पारदर्शकता ठेवा. सन २०२३ पासून परिवहन विभागाच्या विविध पदांच्या बदल्या या ऑनलाइन पद्धतीने होत आहेत. यामध्ये मानवी हस्तक्षेपाला कोणती संधी नाही. यापुढे देखील या ऍपमध्ये आवश्यक त्या सुधारणा करून होणार्‍या बदल्या अत्यंत पारदर्शक होतील याबाबत दक्ष रहावे. तसेच अधिकार्‍यांच्या बरोबरच लिपिक पदाच्या देखील बदल्या या ऍपद्वारे होतील असे निर्देश मंत्री सरनाईक यांनी यावेळी दिले.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg