loader
Breaking News
Breaking News
Foto

आता तापमानात वाढ; मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरीसाठी उष्ण आणि दमट परिस्थितीचा पिवळा इशारा जारी

महाराष्ट्र आणि मुंबईत (Mumbai) हवामानात पुन्हा वेगवेगळे बदल दिसत आहेत. यानुसार भारतीय हवामान खात्याने (IMD) राज्यभरात वेगवेगळे इशारे जारी केले आहेत, जे पाहता काही ठिकाणी लोकांना काळजी घेण्याची गरज आहे. मुंबईत सध्या वातावरणात उष्णता वाढल्याचे दिसत आहे. भारतीय हवामान विभागाने मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गसाठी पुढील तीन दिवसांसाठी, उष्ण आणि दमट परिस्थितीचा पिवळा इशारा जारी केला आहे. बाकी इतर जिल्ह्यांमध्ये हवामान कोरडे राहणार आहे. याआधी 11 एप्रिलपर्यंत महाराष्ट्रात कमाल तापमानात हळूहळू 3-4 अंश सेल्सिअसने वाढ होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली होती.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

रविवारी, मुंबईच्या सांताक्रूझ वेधशाळेत किमान 24 अंश सेल्सिअस आणि कमाल 33.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. गेल्या आठवड्यात महाराष्ट्रातील अनेक भागात अवकाळी पाऊस पडला, परंतु आता पुन्हा उष्णता वाढत असल्याचे दिसत आहे. हवामान खात्याकडून पुढील काही दिवस कोणत्याही ठिकाणी पावसाचा इशारा देण्यात आलेला नाही. केवळगडचिरोली आणि चंद्रपूर येथे 10 एप्रिलला वादळासह वादळी वारे आणि विजांचा कडकडाट होण्याची शक्यता वर्तवली आहे.

टाइम्स स्पेशल

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg