वेळणेश्वर : शासनाच्या विविध निर्णयांची कोटेकोर अंमलबजावणी गावागावात अंगणवाडी सेविका प्रमाणिकपणे करीत असतात. त्यांच्यामुळेच शासनाच्या विविध योजना लोकांपर्यंत पोहचत असतात आणि यशस्वी होतात. अशा अंगणवाडी ताईंच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी अधिकार्यांनी बैठक घ्यावी, असे सांगतांनाच शालेय पोषण आहारामध्ये निकृष्ट धान्य पुरविणार्या ठेकेदारांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, असे निर्देशही पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी दिले. अंगणवाडी सेविकांच्या अडचणी संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आज बैठक झाली. बैठकीला जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी श्रीकांत हावळे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी आदी उपस्थित होते.
पालकमंत्री डॉ. सामंत म्हणाले, अंगणवाडी सेविकांवर अन्याय होणार नाहीत, याची जबाबदारी अधिकार्यांनी घेतली पाहिजे. त्यांना नाहक त्रास होईल, असे निर्णय जिल्हास्तरावर होता कामा नये. त्यांच्या सुट्टीच्या बाबतीत या जिल्ह्याची भौगोलिक रचना, येथील धार्मिक सण यावर आधारित शासनाकडे प्रस्ताव पाठवावा. ठेकेदारांनी जर निकृष्ट धान्य पुरविले असेल तर त्याचे खापर तसेच सगळा रोष अंगणवाडी सेविकांवर येतो. याची तपासणी करुन अशा निकृष्ट धान्य पुरविणार्या ठेकेदारांवर गुन्हे दाखल करावेत. नवीन अंगणवाडी इमारत बांधताना जिल्हा परिषदेने प्रथम शासकीय जागेची निवड करावी. त्याबाबतचा प्रस्तावा महसूल यंत्रणेशी चर्चा करुन करावा. रिक्त पदांसाठी नवीन भरती करत असताना पुर्वीच्या एकाही अंगणवाडी सेविकांना काढून टाकले जाणार नाही, असे पालकमंत्री डॉ. सामंत म्हणाले.
3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.