रत्नागिरी (टाइम्स न्यूज नेटवर्क) : कोरोनापूर्व काळात ग्रामीण महिला व पुरुषांच्या गटाने घेतलेल्या कर्जाची वसुली कोरोना काळात देखील सुरुवातीचे काही महिने करण्यात आली. खाजगी वित्तीय संस्थांच्या वसुली कर्मचार्यांनी महिलांकडून अशाप्रकारची वसुली करण्यात आली. त्याचा कोणताही पुरावा राहणार नाही, याची काळजी यावेळी वित्तीय संस्थांच्या कर्मचार्यांनी घेतली. त्यामुळे कोरोना काळात महिलावर्गाने दिलेले पैसे जमा झाले नाहीत. त्याची वसुली व्याजासह काही वित्तीय संस्था आता करीत आहेत.
रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री ना.उदय सामंत यांनी खाजगी वित्तीय संस्थांनी दांडगाईने वसुली करु नये तसेच काही कंपनी व फायनान्स कंपन्यांची नावे देखील नाम.सामंत यांनी उघड केली होती. त्याव्यतिरिक्त आणखी काही फायनान्स कंपन्यांनी रत्नागिरीत गटाला कर्ज दिले आहे. त्याची परतफेड देखील गटांनी केली आहे. तरीदेखील ग्रामीण भागातील महिलांकडून जोरजबरदस्तीने फायनान्स कंपन्या पावतीशिवाय वसुली करताना दिसत आहेत.
रत्नागिरी नाचणे परिसरातील स वरुन सुरु होणारी फायनान्स कंपनी आपल्या कर्मचार्यांकडून ग्रामीण भागात थकीत कर्जाची वसुली व्याजासह करीत आहे. कोरोना काळात पैसे जमा करुनही ही रक्कम वसुल केली जात आहे. महिलावर्गाला पूर्वसूचना न देता दारावर येऊन हे वसुली कर्मचारी दांडगाईने वसुली करीत आहेत तसेच रक्कम जमा करुनही पावत्या देत नसल्याने ही फायनान्स कंपनी लूट करीत असल्याचे म्हटले जात आहे. विनाकॉल दारी येणार्या फायनान्स कंपन्यांच्या वसुली कर्मचार्यांना पालकमंत्री आणि जिल्हाधिकारी चाप लावणार का? असा प्रश्न ग्रामीण भागातील महिलावर्गातून उपस्थित केला जात आहे.
3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.