loader
Breaking News
Breaking News
Foto

पावसाळ्यापूर्वी लांजा शहरात पक्का सर्व्हिस रस्ता होईल का? जनतेतून सवाल

केळंबे-लांजा (सिराज नेवरेकर) : मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे कामामुळे लांजा शहरातील रस्त्यांची खूपच दुरावस्था झाल्यामुळे वाहने चालविणे धोकादायक झाले असून पायी चालणे जीवावर बेतणारे आहे. त्यातच दुतर्फा गटाराचे बांधकाम सुरू असुन उड्डाणपूलाचे काम जोरदार सुरू आहे. खड्डेमय खराब झालेल्या रस्त्यावरून वाहनांसह पादचारी यांची सतत वर्दळ असते. पक्का सर्व्हिस रस्ता नसल्यामुळे वाहनधारक तसेच पादचारी यांची मोठी गैरसोय निर्माण झाली आहे. पावसाळा तोंडावर आला असता पावसाळ्यापूर्वी तरी सर्व्हिस रस्ता होईल की नाही? याची शाश्वती नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे पावसाळ्यात या रस्त्यावरून प्रवास करणे अत्यंत धोकादायक आणि जीवघेणे ठरणार असल्याचे बोलले जात आहे. जनतेच्या सहनशीलतेचा अंत झाला असल्याचा तीव्र संताप जनतेतून व्यक्त केला जात आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

लांजा शहरात आजतागायत सर्व्हिस रस्ता करण्यात आलेला नाही. एप्रिल महिन्यात सर्व्हिस रस्ता पूर्ण होईल असे महामार्ग अधिकारी यांनी पत्रकार यांना माहिती देताना सांगितले. मात्र एप्रिल महिना संपत आलाय, पावसाळा तोंडावर येत चाललाय. संबधित अधिकारी याबाबत गांभीर्याने दखल घेऊन जनतेची गैरसोय दूर करतील का? असा सवाल लांजातील जनतेतून उपस्थित केला जात आहे. आश्वासन दिलेल्या कालावधीत रस्त्याचे काम आजतागायत पूर्ण झालेले नाही, याबाबत जनतेतून प्रचंड नाराजी व्यक्त केली जात आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg