loader
Breaking News
Breaking News
Foto

माईण गावात घराला वीज गळतीमुळे भीषण आग; पालकमंत्री नितेश राणे यांची घटनास्थळी भेट

कणकवली तालुक्यातील मौजे माईण येथे दिनांक २ फेब्रुवारी रोजी रात्री ९.३० वाजता वीज गळतीमुळे श्री. अनिल दिनकर सुखटणकर यांच्या घराला अचानक भीषण आग लागली. या आगीत घर संपूर्णतः जळून खाक झाले असून, एकूण अंदाजे नुकसानाची रक्कम रु. ६१,३४,९००/- इतकी असल्याचे प्राथमिक पंचनाम्यात नमूद करण्यात आले आहे. घटनेनंतर तत्काळ पालकमंत्री व मत्स्य व्यवसाय व बंदर विकास मंत्री मा. नितेश राणे यांनी माईण गावाला भेट देऊन आपदग्रस्त कुटुंबाची भेट घेतली आणि नुकसानग्रस्त ठिकाणाची पाहणी केली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

सदर आगीच्या घटनेचा पंचनामा ग्राम महसूल अधिकारी, ओटव यांनी तयार करून संबंधित कार्यालयात सादर केला आहे. या अहवालास अनुसरून पुढील मदत व कार्यवाहीची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. आपत्तीग्रस्त कुटुंबास योग्य ती मदत मिळावी यासाठी स्थानिक प्रशासन व अधिकारी व वीज मंडळ यांनी आवश्यक पावले उचलावीत,अशा सूचना नामदार नितेश राणे यांनी दिले आहेत.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg