दोडामार्ग(प्रतिनिधी)- तिलारी घाट हा अवजड वाहनांना धोकादायक आहे. नेहमी ये जा करणार्या वाहन धारकांना घाटातील धोकादायक चढ उतार याची माहिती आहे. पण पहिल्यांदा मालवाहतूक वाहने घेऊन येतात त्यांचा अंदाज चुकला की अपघात होण्याची शक्यताच. रविवारी घाटमाथ्यावरील एक टेम्पो मोठ्या प्रमाणात कांदा तसेच इतर सामान घेऊन गोवा या ठिकाणी जाण्यासाठी घाट उतरून खाली येत असताना धोकादायक अपघातग्रस्त वळणावर जयकर पॉईंट येथे टेम्पो पलटी होऊन नुकसान झाले. सुदैवाने यात कुणी जखमी झाले नाही. टेम्पो मधिल चालक व इतरांना कोणत्याही प्रकारची दुखापत झाली नाही. पण वाहनांचे नुकसान झाले. पण टेम्पो पलटी झाल्याने इतर वाहनांना थोडा अडथळा निर्माण झाला. तिलारी घाटातील अवजड वाहने यावर चंदगड पोलीस, बांधकाम विभाग यांचे लक्ष नाही का? यामुळे मोठी वाहने पुन्हा सुरू झाली आहे. गेल्या आठवड्यात एक कंटेनर अडकून सात वाहतूक बंद झाली होती. जयकर पॉईंट येथे या अगोदर देखील अपघात होऊन संरक्षण कठडे तोडून टाकले आहेत. पावसाळ्यात या ठिकाणी उपाययोजना करावी अशी मागणी केली जात आहे. अपघातग्रस्त टेम्पो बाजूला करण्यासाठी क्रेन बोलवण्यात आली होती.
टाइम्स स्पेशल
मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेंतर्गत रत्नागिरी ते अयोध्या यात्रेचा नामदार कदम यांच्या हस्ते शुभारंभ
3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.