loader
Breaking News
Breaking News
Foto

बँकेत अडकले पैसे, लेकीचं लग्न अडलं; बापाचा बँकेच्या गेटवरच गळफास

कष्ठाने कमावलेला पैसा मोठ्या विश्वासाने छत्रपती मल्टीस्टेट सहकारी पतसंस्था ठेव म्हणून ठेवला पण, अनेकदा मागणी करुनही बँकेने पैसे न दिल्याने एका वधूपित्याने आत्महत्या () केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सदर घटना बीड (Beed) जिल्ह्यातील गेवराई शहरात घडली. सुरेश आत्माराम जाधव असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. जाधव यांनी बँकेत ठेव म्हणून ठेवलेली रक्कम मुलीच्या लग्नासाठी हवी होती. त्यासाठी त्यांनी बँकेकडे चकरा मारल्या. पण अनेकदा विनंत्या करुनही पैसे न दिल्याने त्यांनी बँकेच्या प्रवेशद्वाराला गळफास घेत आत्महत्या केल्याची माहिती आहे. घटनेमुळे संपूर्ण बीड जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

छत्रपती मल्टीस्टेट सहकारी पतसंस्थेच्या प्रवेशद्वारावर गळफास घेऊन आत्महत्या केलेले 40 वर्षीय आत्मराम जाधव हे मुळचे गेवराई तालुक्यातील खळेगाव येथील रहिवासी आहेत. त्यांनी बँकेत एक-दोन नव्हे तर तब्बल 11 लाख रुपयांची ठेव ठेवल्याचे समजते. जाधव यांच्या मुलीचे लग्न होते. त्यासाठी ते बँकेत पैशांसाठी चकरा मारत होते. पण, अनेकदा विनंती करुनही बँकेने त्यांना पैसे दिलेच नाहीत परिणामी आर्थिक चिंतेत असलेल्या जाधव यांनी टोकाचे पाऊल उचलले. दरम्यान, पोलिसांनी माहिती मिळताच घटनास्थळी हजेरी लावली आणि मृततेही ताब्यत घेत पंचनामा केला. पुढील कायदेशीर कारवाई सुरु असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.

टाइम्स स्पेशल

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg