रत्नागिरी (वार्ताहर) : ‘‘विकास हाच आमचा धर्म. समाजाचं आणि धर्माचं राजकारण हे विकासापेक्षा मोठे समजणारा कार्यकर्ता मी नाही. कुठच्या समाजाचा माणूस आहे हे न बघता त्याच्या अडीअडचणीला धावून जाणं आणि विकासकाम करणं हाच आमचा धर्म आहे’’, असे सांगत राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी २ डिसेंबरला शिवसेना-भाजप युतीच्या उमेदवारांना भरघोस मतदान करा, असे आवाहन केले. देशातील पहिले क्रुज टर्मिनल महाराष्ट्रात साडेतीनशे कोटी रुपये खर्चून होत आहे. हे पहिले क्रुज टर्मिनल भगवती बंदरच्या किनार्यावर होत असल्याचेही त्यांनी आवर्जून सांगितले.
रत्नागिरीतील महायुतीच्या प्रभाग क्र. १४ व १५ मधील प्रचार सभेत त्यांनी मार्गदर्शन केले. यावेळी ना. सामंत यांनी जातीयवादावर सडकून टीका केली. निवडणुकीच्या शेवटच्या दिवसांमध्ये होणार्या जाती-धर्माच्या राजकारणावर त्यांनी नाराजी व्यक्त करीत, काही मंडळी जाणूनबुजून गैरसमज पसरवत आहेत, याला बळी पडू नये, असे आवाहन केले. आम्ही ज्या धर्मातून मोठे झालो, त्यात दुसर्या धर्माचा तिरस्कार करायला सांगितला नाही. तसेच ते अन्य कुठल्याही धर्मात सांगितलेले नाही. दिल्लीतून किंवा मुंबईतून कोणी काही वाईट सांगत असेल, त्यापेक्षा तुमच्याबरोबर २५ वर्षे काम केलेल्या उदय सामंतचा विचार करा, असे आवाहन त्यांनी केले.
मिरकरवाड्याच्या विकासाचा दाखला देताना गेल्या २५ वर्षांत आपल्याशिवाय कोणी एक रुपया खर्च केला नसल्याचे सांगत त्यांनी मत्स्यव्यवसायाच्या कामांचा उल्लेख केला. मिरकरवाड्याच्या जेटीवर हिंदू-मुस्लिम गुण्यागोविंदाने मच्छीमारी करत आहेत, म्हणून ८० कोटी रुपयांच्या तिसर्या टप्प्याला मंजुरी मिळाल्याचे त्यांनी सांगितले. महिला मच्छीमार भगिनींच्या मासे सुकवण्याच्या जागेचा प्रश्नही मार्गी लावण्याचे आश्वासन त्यांनी दिले. कब्रस्तानच्या नोंदीचा अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला प्रश्न त्यांनी उपस्थित केला. वर्षानुवर्षे आपलीच भगिनी नगरपालिकेत निवडून पाठवूनही कब्रस्तानची नोंद झाली नाही, पाखाड्या झाल्या नाहीत, पण ३ तारखेला शिवसेनेचा नगराध्यक्ष बसल्यानंतर पुढच्या १५ दिवसांत कब्रस्तानची नोंदणी करण्यापासून सगळ्या समस्या दूर होतील, अशी ग्वाही त्यांनी दिली. देशातील पहिले क्रुज टर्मिनल महाराष्ट्रात साडेतीनशे कोटी रुपये खर्चून होत आहे. हे पहिले क्रुज टर्मिनल भगवती बंदरच्या किनार्यावर होत असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी शिवसेना जिल्हासंपर्कप्रमुख यशवंत जाधव, जिल्हाप्रमुख राहुल पंडित, राजू महाडिक, भाजपाचे ऍड. दीपक पटवर्धन, माजी नगराध्यक्ष अशोक मयेकर, शिल्पा सुर्वे, बंटी कीर, निवेदिता कळंबटे आदी उपस्थित होते.






































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.