loader
Breaking News
Breaking News
Foto

लाडके नेते अजितदादा पवारांना शाशकीय इतमामात अखेरचा निरोप;बारामतीत अश्रूचा बांध फुटला

बारामती: अजितदादा पवारांना आज अखेरचा निरोप भावपूर्ण वातावरणात देण्यात आला . बारामतीत अश्रूचा बंध फुटला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली आणि धक्कादायक निधनाने संपूर्ण महाराष्ट्र अक्षरशः सुन्न झाला आहे. विश्वास बसणार नाही, पण वास्तव नाकारता येत नाही… राज्याच्या राजकारणात वादळासारखी उभी राहणारी, प्रत्येक निर्णयात ठामपणा आणि प्रत्येक शब्दात आक्रमकता असलेली ‘दादा’ची गर्जना आज कायमची शांत झाली आहे. पवार कुटुंबीयांसह संपूर्ण महाराष्ट्र अश्रूंनी ओथंबला असून, लाखो चाहत्यांच्या डोळ्यांत आजही एकच प्रश्न आहे – “हे असं अचानक कसं घडलं?”

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

आज सकाळी 9 वाजेपर्यंत अजितदादांचे पार्थिव काटेवाडी येथील निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले आहे. घराबाहेर प्रचंड गर्दी उसळली असून, “दादा अमर रहें”, “अजितदादा आगे बढो” या घोषणा देत अश्रूंनी डोळे पुसणारे कार्यकर्ते, सर्वसामान्य नागरिक, महिला, वृद्ध, तरुण मोठ्या संख्येने दाखल होत आहेत. सकाळी ९ वाजता अंत्ययात्रेला सुरुवात झाली . त्यानंतर सकाळी 11 वाजता बारामतीतील विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगणात शासकीय इतमामात अजितदादांवर अंत्यसंस्कार केले जात आहेत.

टाइम्स स्पेशल

या अंत्यविधीसाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह देशभरातील अनेक दिग्गज नेते बारामतीत येत आहेत. मात्र पदे, पक्ष, राजकारण या साऱ्यापलीकडे जाऊन आज प्रत्येक जण एका हरवलेल्या नेतृत्वाला, एका आक्रमक आवाजाला, एका न थकणाऱ्या योद्ध्याला अखेरचा निरोप देण्यासाठी येत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg