loader
Breaking News
Breaking News
Foto

लोकांच्या सुख-दुखात सोबत असल्याने आता फक्त निवडणुक जिंकायचीयः नेहा रविंद्र माने

रत्नागिरी (डिजीटल डेस्क) - संगमेश्वर तालुक्यातील साडवली जिल्हा परिषद मतदार संघाच्या उमेदवार नेहा रविंद्र माने यांनी मतदार संघात प्रचारात मोठी झेप घेतली आहे. आपल्या उमेदवरी संदर्भात बोलताना सौ. नेहा माने म्हणाल्या ‘१९९२ पासून राजकीय व सामाजिक क्षेत्रात आम्ही काम करीत असून यापूर्वी याच मतदार संघातून जिल्हा परिषद मध्ये सदस्य म्हणून निवडून गेले होते, त्यामुळे प्रत्येक मतदारांची ओळख आहे. लोकांच्या सुखदुखाःत ४० वर्ष सोबत असल्याने निवडणुक फक्त जिंकायची आहे.’असे म्हणाल्या.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे मी उमेदवारी करीत असून आमचे सामाजिक कार्य मतदार संघातील प्रत्येक घर आणि कुटुंबापर्यंत नेहमी सुरु असते. लोकांच्या अडीअडचणींमध्ये आम्ही नेहमीच सोबत असतो. आता फक्त लोकांच्या गाठीभेटी घेवून चिन्हाची ओळख करुन देत आहोत. माझ्या साडवली मतदार संघात पक्षाचे जाळे विणलेले आहे. इथे तळागाळापर्यंत शिवसेना शाखांचा विस्तार असून शेकडो शिवसैनिक शिवसेना ठाकरे पक्षासोबत एकनिष्ठ आहेत. त्यामुळे माझी निवडणुक प्रत्येक शिवसैनिकाने आपल्या खांद्यावर घेतली आहे. माझा विजय म्हणजेच माझ्या कार्यकर्त्यांचा विजय आहे, असे समजूनच माझ्या मतदार संघातील प्रत्येक कार्यकर्ता सक्रिय आहे, त्यामुळेच मला विजयाची १०१ टक्के खात्री आहे. हा विजय विकासाचा आणि कौटुंबिक नात्याचा विजय ठरणार आहे. माझा माझ्य शिवसैनिकांवर अप्रतिम प्रेम आणि विश्‍वास असल्याचे त्या म्हणाल्या.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg