loader
Breaking News
Breaking News
Foto

ठाणे महानगरपालिकेत बहुमत मिळाल्यानंतर तरी 'धर्मवीर आनंद दिघे साहेब' प्रवेशद्वाराचे काम सत्ताधारी करतील का?; केदार दिघे यांचा शिंदेसेनेला सवाल

ठाणे (प्रतिनिधी): ठाणे महानगरपालिकेत सत्ताधाऱ्यांनी बहुमताने सत्ता काबीज केली असली, तरी शहराच्या अस्मितेशी जोडल्या गेलेल्या कामांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप आता होऊ लागला आहे. ठाणे-मुलुंड या मुख्य रस्त्यावर (आनंद नगर) पूर्वी असलेले 'स्वर्गीय धर्मवीर आनंद दिघे साहेब प्रवेशद्वार' अद्याप भव्य स्वरूपात का उभारले जात नाही? असा संतप्त सवाल शिवसेना (ठाकरे गट) जिल्हाप्रमुख तथा धर्मवीर आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांनी उपस्थित केला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

​मागील अनेक वर्षांनपासून ठाणेकर नागरिक या प्रवेशद्वाराच्या पुनर्बांधणीची मागणी करत आहेत. पूर्वी या ठिकाणी असलेले प्रवेशद्वार आता अधिक भव्य आणि देखण्या स्वरूपात असावे, अशी लोकभावना आहे. मात्र, सत्ताधारी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप केदार दिघे यांनी केला आहे. ​"आता तर महापालिकेत सत्ताधारी बहुमताने निवडून आले आहेत. नगरसेवक सभागृहात बसले आहेत आणि महासभाही नियमित सुरू झाल्या आहेत. मग आता तरी दिघे साहेबांच्या नावाचे हे भव्य प्रवेशद्वार बांधण्यास सुरुवात होणार का?" असा सवाल केदार दिघे यांनी केला आहे.

टाइम्स स्पेशल

प्रलंबित मागणी: ठाणे-मुलुंड चेकनाका येथील मुख्य प्रवेशद्वार भव्य स्वरूपात बांधण्याची मागणी अनेक महिन्यांपासून प्रलंबित आहे. ठाण्यातील सामान्य नागरिक आणि दिघे साहेबांचे प्रेमी या कामासाठी सातत्याने पाठपुरावा करत आहेत. निवडणुकीत यश मिळवूनही महत्त्वाच्या प्रकल्पांना मुहूर्त लागत नसल्याने विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले आहे. आता महानगरपालिकेतील सत्ताधारी या प्रश्नावर काय भूमिका घेतात आणि हे प्रवेशद्वार कधी प्रत्यक्षात येते, याकडे संपूर्ण ठाणेकरांचे लक्ष लागले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg