loader
Breaking News
Breaking News
Foto

महामार्गाचे काम ९.७८१ किमी शिल्लक, आरवली ते कांटे दरम्यान काम सर्वात जास्त शिल्लक

रत्नागिरी : मुंबई गोवा या राष्ट्रीय महामार्गाचे काम आता अंतिम टप्प्यात पोहोचले आहे. एकूण २५९.५१३ किलोमीटर लांबीच्या अंतरापैकी तब्बल २४९.७३२ किलोमीटरचे चौपदरीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. म्हणजे ९६.२३ टक्के काम पूर्ण झाले असून आता केवळ ९.७८१ किलोमीटरचे काम शिल्लक राहिले आहे. सर्वात जास्त काम आरवली ते कांटे आणि कांटे ते वाकड या भागात शिल्लक आहे. विशेषतः परशुराम घाट ते झाराप या पट्‌ट्यातील बहुतांश काम पूर्ण झाले असून प्रवाशांचा प्रवास आता अधिक सुखकर होणार असल्याचे चित्र दिसत आहे. राष्ट्रीय महामार्ग विभागाने ही माहिती दिली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या महामार्गाच्या विविध टप्प्यांचा वेगवेगळ्या पॅकेजचा विचार केल्यास, तळेगाव ते काळमठ आणि झाराप ते पत्रादेवी या भागातील काम १०० टक्के पूर्ण झाले आहे. काळमठ ते झाराप आणि वाकड ते तळेगाव या दरम्यानचे कामही ९९.९९ टक्क्‌यांपर्यंत पोहोचले असून येथे केवळ नाममात्र काम बाकी आहे. परशुराम घाट ते आरवली दरम्यान ३४.४५ किलोमीटरपैकी ३२.११ किलोमीटरचे रस्ते तयार झाले असून येथे ९७.४० टक्के प्रगती झाली आहे.

टाइम्स स्पेशल

सर्वात जास्त काम आरवली ते कांटे आणि कांटे ते वाकड या भागात शिल्लक आहे. आरवली ते कांटे दरम्यान ८५.०५ टक्के काम झाले असून तिथे अजूनही सुमारे अडीच किलोमीटरचा रस्ता तयार होणे बाकी आहे. तसेच कांटे ते वाकड या ४९.१५ किलोमीटरच्या टप्प्यात ९१.१८८ टक्के काम पूर्ण झाले असून तिथे ५ किलोमीटरच्या आसपास कामाची प्रतीक्षा आहे. एकूणच आकडेवारी पाहता, महामार्गाचा हा मोठा हिस्सा आता वाहतुकीसाठी सज्ज होत आला असून कोकणवासीयांचा प्रवास वेगवान होणार आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg