loader
Breaking News
Breaking News
Foto

होळीसाठी कोकणवासीय एम टू एम प्रिन्सेस रोरो बोटीने चालले कोकणात

रत्नागिरी - कोकणवासीय ३८ वर्ष उराशी बाळगलेले जलप्रवासाचे स्वप्न घेवून एमटूएम प्रिन्सेस रो-रो बोटीने आज होळी शिमग्यासाठी चालले कोकणात . ३ सप्टेंबर २०२५ रोजी भाऊचा धक्का ते विजयदुर्ग असा 'एमटूएम प्रिन्सेस' या बोटीची यशस्वी चाचणीही झाली होती. मुंबई ते गोवा जलमार्गावर १९८८ पर्यंत जलवाहतूक सुरू होती. मात्र, ही सेवा प्रत्यक्षात सुरू करण्यासाठी तब्बल १४७ विविध प्रकारच्या परवानग्यांची आवश्यकता होती . यामध्ये 'डी.जी. शिपिंग' कडून मिळणारी अंतिम मंजुरी मिळाली आहे . १५ जुलै १९४७ रोजी झालेल्या 'रामदास' बोट दुर्घटनेच्या कटू आठवणींमुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेचा मुद्दा अत्यंत कळीचा बनला होता. सध्या या बोटीच्या समुद्र तपासण्या, सुरक्षा आराखडे आणि 'स्टॅबिलिटी रिपोर्ट' याकडे लक्ष देणे गरजेचे आहे . हा प्रकल्प केवळ प्रवाशांसाठी आरामदायी असून चालणार नाही, तर तो आर्थिकदृष्ट्या परवडणारा असणेही तितकेच गरजेचे आहे. तिकीट दर आणि बोटीचा देखभाल खर्च यांचा ताळमेळ बसवणे हे गुंतवणूकदारांसमोर मोठे आव्हान आहे. सध्या प्रस्तावित असलेले तिकीट दर ( इकॉनॉमी २५०० रू . प्रीमियम रु ४०००/) हे सर्वसामान्यांच्या खिशाला किती परवडतील, याबाबतही चर्चा चालू आहे. मुंबई-गोवा महामार्गाचे रखडलेले काम आणि कोकण रेल्वेतील तुडुंब गर्दी यामुळे चाकरमान्यांना जलवाहतुकी कडून मोठी आशा आहे . रो-रो बोटीमुळे मुंबईहून रत्नागिरी ३ तासांत, तर सिंधुदुर्ग ६ तासांत गाठणे शक्य होणार आहे. मात्र, जर ही सेवा नियमित सुरू होणे गरजेचे आहे . विजयदुर्गसोबतच भविष्यात रत्नागिरी ,मालवण आणि वेंगुर्ले येथेही जेटी सुविधा उपलब्ध होणे अत्यावश्यक आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg