loader
Breaking News
Breaking News
Foto

तिलारी धरणाच्या पाणी पातळीत वाढ, नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा

दोडामार्ग (प्रतिनिधी) - दोडामार्ग तालुक्यातील तिलारी धरणाची पाणी पातळी नियंत्रित झाल्याने धरणाचे अतिरिक्त पाणी बाहेर पडते त्या खळग्यातील धरणाचे दरवाजे काही दिवसांपूर्वी बंद करून सांडव्यातून नदी पाञात विसर्ग बंद केला होता. पण गेल्या चार पाच दिवस तिलारी पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे. यामुळे धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. पावसाचा जोर वाढला तर बारा तासात केव्हाही धरणाचे दरवाजे उघडून पाणी विसर्ग तिलारी नदी पाञात होणार आहे. तेव्हा नदी काठच्या गावांनी सतर्क राहावे, नदी काठच्या गावांनी नदी किनाऱ्यावर कपडे धुण्यासाठी, गुरे घेऊन किंवा नदी पाञात असलेले काॅजवे, पुल, वरून दिवसाराञी जाण्याचा प्रयत्न करू नये काळजी घ्यावी, असा सावधानतेचा इशारा जलसंपदा उपविभागीय अधिकारी यांनी दिला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg