देवरुख - फटाके न वाजविता जे पैसे उरतील त्या पैशातून खाणे, पिणे, पर्यटनाचा आनंद, गरजूंना मदत, विविध सामाजिक कामात मदत, परिसरात राहणार्या गरिब जनतेला मदत करुया आणि दिवाळीचा आनंद लुटूया, असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते युयूत्सू आर्ते यांनी केले आहे. आजच्या स्पर्धेच्या जगात लोकांना आता जाणीव झाली आहे की, फटाके फोडणे म्हणजे पैसे जाळणे. त्यामुळे फटाके न फोडता पूरग्रस्तांचे अश्रू पुसण्यास, गोरगरिबांची दिवाळी गोड करण्यास मदतरुपी होऊया. प्रदूषणमुक्त, अपघातमुक्त दिवाळी साजरी करण्याचे आवाहन युयूत्सू आर्ते यांनी केले आहे. आपल्या आजूबाजूला वाडीवस्तीत फटाक्यांमुळे ध्वनीप्रदूषण होतेच पण वायूप्रदूषणामुळे वृद्ध नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. ध्वनीप्रदूषण, हवाप्रदूषण, अपघात होणे, आग लागणे, राष्ट्रीय संपत्तीचे नुकसान, आजारी पडणे हे टाळण्यासाठी फटाकेमुक्त दिवाळी जनतेने साजरी करावी आणि राष्ट्रीय कार्याला हातभार लावावा, असे आवाहन प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते युयूत्सू आर्ते यांनी केले आहे.
टाइम्स स्पेशल
सावंतवाडी: मडुरा गावात ओंकार हत्तीचे चव्हाटा मंदिरात 'देवदर्शन'; ग्रामस्थ थक्क
3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.