loader
Breaking News
Breaking News
Foto

१३ मे रोजी अजिंक्य मंगल कार्यालय, लांजा येथे जनता दरबाराचे आयोजन

लांजा (संजय साळवी) - राज्याचे उद्योगमंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या सूचनेनुसार बुधवारी १३ मे रोजी रोजी दुपारी ३ वाजता शहरातील अजिंक्य मंगल कार्यालय येथे जनता दरबार आयोजित करण्यात आला असल्याची माहिती लांजा तहसीलदार प्रियांका ढोले यांनी दिली. गेल्या तीन - चार वर्षात तालुक्याची आमसभा देखील झालेली नाही. त्यामुळे तालुक्यातील गोरगरीब जनतेला आपल्या समस्या मांडण्यासाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध झालेले नाही. म्हणूनच पालकमंत्री उदय सामंत यांनी आयोजित केलेल्या या जनता दरबारात लोकांना आपले प्रश्न, अडीअडचणी, समस्या मांडता येणार आहेत. तरी तालुक्यातील नागरिकांनी आपल्या अडीअडचणी व समस्या मांडण्यासाठी आवश्यक त्या कागदपत्रांसह या जनता दरबाराला उपस्थित राहण्याचे आवाहन लांजा तहसीलदार प्रियांका ढोले यांनी केले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg