रत्नागिरी - रत्नागिरी जिल्हा कृषि उत्पन्न बाजार समितीने मागील दोन वर्ष सातत्याने पाठपुरावा करुनही काजूबी शेतमाल तारण योजनेचा निधी उपलब्ध न झाल्या कारणाने सदरयोजना कार्यान्वीत करता आली नाही. मात्र समितीचे सभापती संदीप सुर्वे यांनी या वर्षी माहे फेब्रु. २६ पासूनच सदर योजनेसाठी लागणा-या निधीसाठी मा. पणन मंडळ पुणे यांचेकडे पाठपुरावा करून माहे मे. २६ मध्ये सदर योजनेच्या निधीची रक्कम जमा होताच दिनांक ०९/०५/२०२६ रोजी दिनकर गणपती पाटील मु.पो. देवरुख, जि. रत्नागिरी यांचेकडील बी तारणात घेऊन तारण कर्जाचा धनादेश पाटील यांचेकडे सुपूर्त करणेत आला.
सदर धनादेश प्रदान करतेवेळी बाजार समितीचे जेष्ठ संचालक हेमचंद्र यशवंत माने व समितीचे मा.सचिव पांडूरंग जयराम कदम व कर्मचारी वर्ग उपस्थित होता. येत्या काही दिवसात काजू-बी तारण प्रक्रीयेत जास्तीत जास्त शेतक-यांना सामावून घेणार असल्याचे मत मा. सभापती संदीप सुर्वे यांनी व्यक्त केले आहे.
























































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.