loader
Breaking News
Breaking News
Foto

रत्नागिरी जिल्हा परिषदेत विकासकामांचा खोळंबा; प्रशासनाच्या संथ कारभारावर प्रश्नचिन्ह

​रत्नागिरी: जिल्हा परिषदेच्या निवडणुका पार पडल्यानंतर आणि नवीन लोकप्रतिनिधींनी पदभार स्वीकारल्यानंतर जिल्ह्याच्या विकासाला गती मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र, प्रशासनाच्या संथ आणि कासवगती कारभारामुळे रत्नागिरी जिल्हा परिषदेत सध्या चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध असूनही विकासकामांचे आराखडे तयार करण्यात प्रशासन अपयशी ठरत असल्याचे चित्र दिसत आहे. ​मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या चार वर्षांत १५ व्या वित्त आयोगांतर्गत जिल्हा परिषदेला सुमारे ४२ कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. या निधीतून पाणीपुरवठा, आरोग्य, बांधकाम आणि समाजकल्याण यांसारख्या महत्त्वाच्या विभागांमध्ये विकासकामे होणे अपेक्षित आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

मात्र, प्रशासकीय यंत्रणा अजूनही २०२२-२३ या वर्षाचेच आराखडे तयार करण्यात व्यस्त आहे. प्रत्यक्षात २०२३ ते २०२६ या पुढील तीन वर्षांचे नियोजन अद्याप कागदावरच आहे. जिल्ह्यामध्ये शिवसेनेने बहुमताने सत्ता मिळवली असून, ५६ पैकी ४१ सदस्य शिवसेनेचे आहेत. नवीन सदस्यांना आपल्या मतदारसंघात विकासकामे करण्याची ओढ लागली आहे, मात्र प्रशासनाच्या दिरंगाईमुळे त्यांच्यासमोर अडचणी निर्माण होत आहेत. ​विशेष म्हणजे, पालकमंत्री उदय सामंत जिल्ह्यात अत्यंत वेगाने दौरे करून कामांचा धडाका लावत असताना, जिल्हा परिषद प्रशासन मात्र त्यांच्या गतीने काम करताना दिसत नाही. लोकसंख्येच्या आणि भौगोलिक निकषांनुसार निधीचे वाटप होणे गरजेचे असताना, प्रशासकीय अधिकारी अजूनही जुन्याच मानसिकतेत असल्याचे जाणवते. समाजकल्याण विभागाकडेही मोठा निधी उपलब्ध आहे, परंतु तेथेही आराखडे तयार करण्यास विलंब होत आहे.

टाइम्स स्पेशल

​दुसरीकडे, नवनिर्वाचित अध्यक्ष अस्मिता केंद्रे आणि उपाध्यक्ष विलास चाळके आपल्या स्तरावर प्रयत्न करत आहेत. शिक्षकांच्या पदोन्नतीचे आणि रिक्त जागांचे प्रश्न त्यांनी मार्गी लावले असून, कोणतीही शाळा शिक्षकाविना राहणार नाही, अशी ग्वाही दिली आहे. मात्र, लोकप्रतिनिधींच्या या सक्रियतेला प्रशासनाकडून योग्य साथ मिळणे आवश्यक आहे. जर ४२ कोटींचा निधी पडून राहिला, तर सदस्यांच्या वाट्याला येणारा प्रत्येकी ४० ते ५० लाखांचा विकासनिधी खर्च कसा होणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. आता पालकमंत्र्यांनीच या प्रकरणात लक्ष घालून प्रशासकीय कामांना गती देण्याची गरज असल्याचे बोलले जात आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg