loader
Breaking News
Breaking News
Foto

कणकवलीतील उन्मतपणा जनतेने निवडणुकीतून गाडला : राजन तेली

कणकवली (प्रतिनिधी) - कणकवलीच्या जनतेने जो विश्वास दाखवलेला आहे. तो विश्वास सार्थकी लावला जाईल. कणकवलीत जो काही उन्मतपणा चालला होता, तो भालचंद्र बाबांच्या भूमीत गाडून टाकल्याची प्रतिक्रिया माजी आ. राजन तेली यांनी दिली आहे. कणकवली नगरपंचायत निवडणूक निकालानंतर माजी आमदार राजन तेली यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. ते म्हणाले, कणकवलीकरांच जाहीर अभिनंदन, संदेश पारकर आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांचा मनापासून अभिनंदन करतो. त्याचबरोबर या सगळ्या निवडणूकीमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री उदय सामंत तसेच या निवडणूकीत ज्यांनी महत्वाचा रोल बजावला ते आमचे आम. निलेश राणे यांचे मनापासून धन्यवाद मानतो.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

आजच्या निकालाने कणकवली विकासाचे नवे पर्व निर्माण होणार आहे. कणकवलीकरांचे मी आभार मानतो. मालवणमध्ये सुद्धा आ. निलेश राणे आणि जिल्हाप्रमुख दत्ता सामंत व त्यांच्या सहकाऱ्यांनी जे काही मेहनत घेतली. बहुमताने मालवणचा नगराध्यक्ष जिंकले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व जिंकलेले सर्व नगराध्यक्ष आणि नगरसेवकांचे मी आभार मानतो.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg