loader
Breaking News
Breaking News
Foto

पक्षाच्या, नेत्याच्या अन् कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता ती वेळी आली. : नितेश राणे

मुंबई : नगरपरिषदेच्या निकालानंतर आता नितेश राणे यांच्या पोस्टने लक्ष वेधलं आहे. गप्प होतो...पक्षाच्या, माझ्या नेत्याच्या आणि कुटुंबाच्या प्रतिमेसाठी..पण काही गोष्टी बोलल्या नाही तर खऱ्या वाटायला लागतात. पण आता ती वेळ आली आहे, असं ट्विट मंत्री आणि भाजपाचे नेते नितेश राणे यांनी केलं आहे. नितेश राणेंच्या या पोस्टमुळे विविध राजकीय चर्चांना उधाण आले आहे. तसेच मालवण आणि सावंतवाडीमधील निकालावरुन नितेश राणेंनी हे विधान केल्याची चर्चांही सध्या रंगली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

राज्यातील 246 नगरपरिषदा आणि 42 नगरपंचायतीच्या निवडणुकीत भाजपाचाच वरचष्मा पहायला मिळतोय. 288 पैकी 117 जागांवर भाजपाचे उमेदवार नगराध्यक्षपदी निवडून आले.. यामध्ये 34 पैकी 32 जिल्ह्यांमध्ये भाजपाचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार विजयी झालेत. फक्त नंदुरबार आणि हिंगोली जिल्ह्यांत भाजपची पाटी कोरी राहिली आहे. भाजपापाठोपाठ शिंदेंची शिवसेना निकालामध्ये दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरलाय. शिंदेंच्या शिवसेनेचे 53 नगराध्यक्ष निवडून आलेत. त्यानंतर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे 37 उमेदवार नगराध्यपदी विजयी झालेत. दरम्यान विधानसभेच्या निवडणुकीप्रमाणे या निवडणुकांमध्येही महाविकास आघाडीला मोठा धोबीपछाड मिळालाय. मविआतील तिन्ही पक्षांना मिळून 50 चा आकडाही पार करता आलेला नाही. तिन्ही पक्षांचा मिळून फक्त 44 जागांवर विजय झालाय. त्यामध्ये काँग्रेसला 28, ठाकरेसेनेला 9 तर पवारांचे 7 उमेदवार नगराध्यपदी विजयी झाले.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg