loader
Breaking News
Breaking News
Foto

जनतेचा विश्वास विकासकामांतून सार्थकी लावू : ना. योगेश कदम

खेड (प्रतिनिधी) - खेड नगर परिषदेच्या निवडणूक निकालानंतर राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. खेडच्या जनतेने आमच्यावर जो विश्वास दाखवला आहे, त्याबद्दल मी मनापासून आभार मानतो. हा विश्वास आम्ही केवळ सत्तेपुरता मर्यादित न ठेवता विकास कामांच्या माध्यमातून सार्थकी लावू, असे योगेश कदम यांनी सांगितले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

ते पुढे म्हणाले की, "वीसही नगरसेवकांची निवड ही जवळपास एकतर्फी झाली असून शिवसेनेचे १७नगरसेवक निवडून येणे हे जनतेच्या पाठिंब्याचे प्रतीक आहे. नगराध्यक्ष शिवसेनेचा नसला तरी महायुतीचे तीन नगरसेवक भाजपाच्या मित्र पक्षाचे आहेत. त्यामुळे खेड शहराच्या सर्वांगीण विकासासाठी समन्वयाने काम केले जाईल. या विजयामुळे खेड शहराच्या विकासाला नवी दिशा मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मुंबई येथे निवडणुकांच्या महाविद्यालयाची नांद कोकणातून सुरू झाली असल्याचे मत ना. योगेश कदम यांनी व्यक्त केले.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg