loader
Breaking News
Breaking News
Foto

वारस नोंदी रखडल्याने नागरिक त्रस्त; कारवाई न झाल्यास जनआंदोलनाचा इशारा- सरपंच बाबू पवार यांचा इशारा

संगमेश्वर (प्रतिनिधी) - मौजे नायरी, शृंगारपूर, निवळी व तिवरे घेरा ही महसुली गावे सह्याद्रीच्या पायथ्याशी वसलेली असून या गावांतील नागरिकांना महसूल कार्यालयाच्या दिरंगाईमुळे मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. महसुली गावांतील नागरिकांनी वर्षानुवर्षे वारस तपासणी व वारस नोंदणीसाठी दाखल केलेल्या अर्जांवर संबंधित महसूल अधिकारी कोणतीही कार्यवाही करत नसल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. अनेक नागरिकांचे अर्ज तलाठी कार्यालयात तसेच पडून असून, काही अर्जदारांचा अर्ज दाखल केल्यानंतर मृत्यूही झाला आहे. मात्र अद्याप त्यांच्या सात-बारा उताऱ्यावर वारस नोंद झालेली नाही.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

वारंवार तलाठी कार्यालयात हेलपाटे मारूनही नागरिकांना कोणतीही सहकार्याची भूमिका मिळत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. या प्रकारामुळे शेतजमीन व्यवहार, कर्जप्रकरणे तसेच शासकीय योजनांचा लाभ घेण्यात अडथळे निर्माण होत आहेत. महसूल अधिकारी दीर्घकाळ जाणूनबुजून बेजबाबदारपणे वागत असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. या प्रकरणी शृंगारपूर ग्रामपंचायतीचे सरपंच विनोद पवार यांनी तहसीलदारांना निवेदन देत संबंधित महसूल अधिकाऱ्यांविरोधात तात्काळ तक्रार दाखल करून नागरिकांना न्याय द्यावा, अशी मागणी केली आहे.

टाइम्स स्पेशल

तसेच दोषी अधिकाऱ्यांवर तातडीने कारवाई करावी किंवा त्यांच्या जागी इतर महसूल अधिकाऱ्यांची नेमणूक करावी, अशी स्पष्ट मागणी करण्यात आली आहे. जर तात्काळ दखल घेतली गेली नाही, तर आम्हा नागरिकांना जनआंदोलन उभे करावे लागेल, असा इशाराही सरपंच विनोद उर्फ बाबु पवार यांनी निवेदनाद्वारे दिला आहे. महसूल प्रशासन या गंभीर समस्येकडे कोणती भूमिका घेते, याकडे आता संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg