loader
Breaking News
Breaking News
Foto

दोडामार्ग तालुक्यातील अनेक गावात परतीच्या पावसाचा तडाखा, बळीराजा संकटात

दोडामार्ग (प्रतिनिधी) - काही दिवसांपूर्वी परतीच्या पावसाने झोडपून काढले होते यामुळे पाऊस गेला असे वाटत होते, काही शेतकरी बांधवांनी भात कापणीला सुरूवात केली होती. असे असताना दुपारी अचानक ढगांच्या गडगडाटासह वीजांचा लखलखाट, वादळी वाऱ्यासह आलेल्या परतीच्या पावसाने दोडामार्ग शहर तसेच परिसरातील अनेक गावात झोडपून काढले. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले. भात शेतीला या पावसाचा फटका बसला. अचानक झालेल्या परतीच्या पावसाने नागरीकांची वाहनधारकांची तारांबळ उडाली. अनेकांना घर - दुकाने याचा आसरा घेऊन पावसापासून बचाव करावा लागला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

दोडामार्ग तालुक्यात गेले काही दिवस नवराञौत्सव पार पडल्यावर पावसाने झोडपून काढले होते यामुळे पाऊस गेला असे वाटत होते. हवामान खात्याने अंदाज वर्तवला होता. चार पाच दिवस प्रंचड उखाडा निर्माण झाला होता. अशातच पावसाने झोडपून काढले. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले. अनेक गावात बत्ती देखील गुल झाली.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg