loader
Breaking News
Breaking News
Foto

मालवण येथील भंडारी ए.सो हायस्कूलमध्ये वाचन प्रेरणा दिनानिमित्त ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन

मालवण (प्रतिनिधी) - आयुष्यात जे प्रत्यक्ष अनुभव घेता येत नाही ते अनुभव पुस्तकाच्या वाचनातून घेता येतात पुस्तके वाचल्याने माणूस समृद्ध आणि सशक्त बनतो आणि समाजात वावरताना तो चांगल्या पद्धतीने वाटचाल करतो पुस्तकामुळे माणसाचे मस्तक हे सशक्त बनते आणि सशक्त मस्तक हे कोणापुढे नतमस्तक होत नाही म्हणून वाचनाची कास धरा असे प्रतिपादन भंडारी एज्युकेशन सोसायटी मालवण मुंबईचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री वामन खोत यांनी येथे बोलताना केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

भारताचे माजी राष्ट्रपती, मिसाइल मॅन डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांच्या जयंतीच्या निमित्ताने वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला या निमित्ताने ग्रंथ प्रदर्शन भरविण्यात आले होते\ या ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन भंडारी एज्युकेशन सोसायटी (मालवण) मुंबईचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री वामन खोत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापक एच बी तिवले, पर्यवेक्षक आर डी बनसोडे, ग्रंथपाल प्रफुल्ल देसाई सहाय्यक शिक्षिका सरोज बांदेकर, सहाय्यक शिक्षिका व्हि एन वाक्कर वरिष्ठ लिपिक पी टी गोसावी, कनिष्ठ लिपिक रेश्मा ढवण, परिचर विलास वळंजू आणि विद्यार्थी वर्ग उपस्थित होता. प्रारंभी प्रफुल्ल देसाई यांनी प्रास्ताविक केले तर मुख्याध्यापक एच बी तिवले यांनी स्वागत केले. यावेळी श्री खोत यांनी पुस्तके व वाचन यांचे महत्व विषद केले, शेवटी बनसोडे यांनी आभार मानले.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg