loader
Breaking News
Breaking News
Foto

साटेली भेडशी चर्मकार समाज स्मशानभूमी नदीपाञात जाणार्‍या रस्त्यावर कचर्‍याचे साम्राज्य

दोडामार्ग (प्रतिनिधी) - साटेली भेडशी ही दोडामार्ग तालुक्यातील मोठी ग्रामपंचायत असून देखील स्वच्छता अभियान तसेच कचरा मुक्त अभियान यासाठी राज्य सरकारकडून लाखो रुपये निधी उपलब्ध करून दिला जातो, पण साटेली भेडशी ग्रा. पं. कडून कचरा गोळा योग्य पद्धतीने केला जात नाही. शिवाय हा कचरा चक्क चर्मकार समाज स्मशान भूमी तसेच नदी पाञात जाणार्‍या रस्त्यावर टाकला जात आहे यामुळे दुर्गंधी पसरली आहे. तेव्हा या ठिकाणी टाकलेल्या कचर्‍याचा बंदोबस्त करून परिसर स्वच्छ करावा अशी मागणी केली जात आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

साटेली भेडशी गावात ठिकठिकाणी कचरा ढिग बघायला मिळतात. गेल्या काही महिन्यांपासून गोळा केलेला सुका किंवा ओला कचरा विल्हेवाट लावणे ग्रामपंचायत तसेच कामगार यांची जबाबदारी आहे. पण असे होताना दिसत नाही. दोडामार्ग ते साटेली भेडशी मुख्य रस्ता तसेच पावसाळी पर्यायी मार्ग येथून चर्मकार समाज यांच्या स्मशान भूमीत तसेच नदी पाञात जाणारा रस्ता आहे. या ठिकाणी कचरा टाकू नये असे सूचना फलक लावले आहेत. हे फलक शोभेचे बाहुले बनले आहे. येथून कचरा टाकायला सुरूवात करत पुढे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात कचरा गोळा करून टाकला आहे. यामुळे धड स्मशान भूमीत जाता येत नाही, नदीत जाता येत नाही. अशी भयानक स्थिती कचर्‍यामुळे निर्माण झाली आहे. ही बाब चर्मकार समाज बांधवानी ग्रा. पं. यांच्या निदर्शनास आणून देखील काही उपाययोजना केली नाही. तेव्हा साटेली भेडशी ग्रामपंचायत यांनी तातडीने दखल घेऊन येथील कचरा गोळा करून बंदोबस्त करून रस्ता स्वच्छ करावा अशी मागणी केली जात आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg