loader
Breaking News
Breaking News
Foto

हळबे महाविद्यालयात महात्मा फुले यांना आदरांजली

साटेली (प्रतिनिधी) - आज आपण सन्मानाने जगतो, महिला मोठ्या पदावर पोहोचतात, हे सर्व महात्मा फुले यांच्या त्यागाचे फलित आहे. म्हणून आपण सर्वांनी त्यांच्या ऋणात राहिले पाहिजे. आजच्या दिवसाचे औचीत्य साधून त्यांचे साहित्य वाचले पाहिजे. असे प्रतिपादन प्राचार्य डॉ.सुभाष सावंत यांनी केले. दोडामार्ग येथील लक्ष्मीबाई सिताराम हळबे महाविद्यालयात महात्मा फुले यांना आदरांजली वाहण्यात आली त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ.पी.डी गाथाडे अंतर्गत गुणवत्ता हमी विभागाचे प्रमुख प्रा. दिलीप बर्वे, अजीवन अध्यायन विभागाचे प्रमुख डॉ सोपान जाधव होते. सांस्कृतिक विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात महात्मा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

समाजातील महिला, शेतकरी, शिक्षण आणि शोषित वंचितांच्या उद्धारासाठी महात्मा फुले यांनी संपूर्ण आयुष्य वाहून घेतले. रायगडावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढली. महाराजांवरचा पहिला पोवाडा लिहिला. विधवा महिलांचा छळ होत होता, त्यातून अनेकांवर मातृत्व लादले जात होते. त्यामुळे अनेक महिला आत्महत्या करीत होत्या, अशा महिलांना त्यांनी आधार दिला. त्यांच्या मुलांचा सांभाळ केला. त्यावेळी असे काम करणे सोपे नव्हते, पण फुलेनी ते करून दाखवले. घरचे श्रीमंत असणारे फुले यांनी तन, मन, धनाने, समाज परिवर्तन केले. आपल्या संपत्तीचे दान धर्म केले. त्यामुळे स्वतःचा उदरनिर्वाह करणेही त्यांना कठीण झाले होते. त्यांचा हा त्याग आपण विसरता कामा नये, असे मौलिक विचार यावेळी मांडण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गाथाडे यांनी केले तर उपस्थितांचे आभार प्रा. दिलीप बर्वे यांनी मानले.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg