loader
Breaking News
Breaking News
Foto

​ई-पीक पाहणी ॲप बंद असल्याने शेतकरी हवालदिल; वन्य प्राणी नुकसानीच्या पंचनाम्यापासून वंचित

सावंतवाडी (प्रतिनिधी): शासनाने शेतकऱ्यांसाठी ४ ऑक्टोबरपासून सुरू केलेला महत्त्वाकांक्षी 'ई-पीक पाहणी' ॲप गेली २० दिवस उलटूनही अजून सुरू झालेला नसल्याने शेतकरी वर्गात तीव्र नाराजी पसरली आहे. 'ई-पीक पाहणी' म्हणजेच शेतकऱ्यांच्या बांधावरील फळ व शेतीची प्रत्यक्ष ॲपद्वारे नोंद करण्याची प्रक्रिया ठप्प झाली आहे. ​या ॲपद्वारे शेतकऱ्यांच्या वतीने सहायक पोलीस पाटील यांनी पिकांची नोंदणी करणे अपेक्षित आहे. मात्र, ४ ऑक्टोबरपासून ते २४ ऑक्टोबरपर्यंत हा ॲप कार्यान्वित झालेला नाही.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यामुळे शेतकऱ्यांची पीक पाहणी होऊ शकलेली नाही, परिणामी शेतकरी वन्य प्राण्यांमुळे झालेल्या शेतीच्या नुकसानीच्या पंचनाम्यापासून वंचित राहात आहेत. ​वनविभाग तसेच तलाठी, सातबारा उताऱ्यावर पिकाची नोंद नसल्याचे कारण देत पंचनामा करण्यास टाळाटाळ करत आहेत. यामुळे नुकसानीचे पुरावे असूनही शासनाच्या मदत योजनेपासून शेतकरी दूर राहण्याची भीती व्यक्त होत आहे.

टाइम्स स्पेशल

तळकटचे माजी सरपंच रामचंद्र सावंत यांनी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली असून, "शासन हा ॲप कधी सुरू करणार, याचे उत्तर संबंधितांनी त्वरित द्यावे," अशी मागणी त्यांनी केली आहे. शेतकऱ्यांचे होणारे नुकसान लक्षात घेऊन शासनाने तातडीने 'ई-पीक पाहणी' ॲप सुरू करावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg