loader
Breaking News
Breaking News
Foto

मुंबई-गोवा महामार्गावरील ९ ब्लॅक स्पॉटचा अडसर होणार दूर; १८ वर्षांनंतर अपघातमुक्तीकडे वाटचाल

संगलट (खेड)( इक्बाल जमादार) - मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ वर इंदापूर ते खेड तालुक्यातील कशेडी बंगला दरम्यान असलेल्या ९ ब्लॅक स्पॉट्सचा अडसर दूर करण्यात यश आल्याची माहिती महामार्ग पोलीस महाड विभागाचे उपनिरीक्षक रामचंद्र ढाकणे यांनी दिली. या उपक्रमामुळे १८ वर्षांनंतर अखेर महामार्ग विभागाला जाग आली असून अपघातांचे प्रमाण लक्षणीयरीत्या कमी होणार आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या दीर्घकाळ रखडलेल्या कामामुळे शेकडो नागरिकांना अपघातात जीव गमवावा लागला होता, तर काही जण कायमचे अपंग झाले होते. आता इंदापूर ते कशेडी बंगला या मार्गावरील मुगवली, तळेगाव, रेपोली, लोणेरे, टेमपाले, लाखपाले, वीर, दासगाव आणि लोहारे हे ब्लॅक स्पॉट्स दूर करण्यात आले आहेत. चौपदरीकरण व रुंदीकरणानंतर रस्ते सुरक्षित झाल्याने प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.

टाईम्स स्पेशल

याशिवाय, महाड उपविभागातील गांधार पालेजवळील महामार्ग पोलीस ठाण्याचे नूतनीकरण करण्याचा प्रस्तावही सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पाठवण्यात आला आहे. त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग पोलिसांना स्वतंत्र व सुसज्ज इमारत मिळणार असून, वाहतूक सुरक्षेची यंत्रणा अधिक बळकट होणार आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg