मुंबई. राज्यात पावसाने हाहाकार उडावला होता. यानंतर आता पुन्हा शेतकऱ्यांची चिंता वाढवली आहे. राज्यात आज अनेक ठिकाणी मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. मुंबई, रायगड, कोल्हापूर या ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळत आहे.मुंबई शहराच्या पश्चिम उपनगरांमध्ये पावसाच्या सरी कोसळत आहेत, तर मालाड पश्चिम सारख्या भागात सतत पाऊस पडत आहे. प्रवाशांना संथ वाहतुकीचा सामना करावा लागला, तर रस्ते आणि सार्वजनिक ठिकाणी पाणी साचले आहे. ज्यामुळे सततच्या उष्णतेपासून दिलासा मिळाला.कोकणात भात कापणीला आले असता पाऊस पडत असल्याने शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. भात पीक कापून शेतातच ठेवण्यात आले आहे. झो डणी कामही काही ठिकाणी सुरू आहे. विशेषता वलाट पट्ट्यातील शेतकऱ्यांचे फार मोठे नुकसान झाले आहे. मळे शेतीचे हे नुकसान झाले आहे.रायगड जिल्ह्यात शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. कापलेले पीक पावसात भिजल्याने शेतकरी ढसाढसा रडत आहे.
शहरातील नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे. मात्र, अनेक ठिकाणी पिकांची काढणी सुरु असल्याने शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे. शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे.राज्यात मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. काल राज्यात अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली. आता आज पुन्हा मुंबईसह अनेक जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे.










































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.