loader
Breaking News
Breaking News
Foto

मुंबईकडे जाणाऱ्या गाड्यांचा आरक्षण कोटा दीड पटीने वाढला

खेड : कोकण रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी समोर आली आहे. रत्नागिरीच्या उत्तरेकडील स्थानकांसाठी मुंबईकडे जाणाऱ्या प्रमुख गाड्यांचा आरक्षण कोटा आता दीड पटीने वाढवण्यात आला आहे. जल फाउंडेशनने १५ ऑगस्ट २०२५ रोजी खेड येथे केलेल्या लाक्षणिक उपोषणाला मोठे यश आले असून, रेल्वे प्रशासनाने प्रवाशांच्या प्रमुख मागण्या मान्य केल्या आहेत. ​रत्नागिरीच्या उत्तरेकडील प्रवाशांना मुंबईला जाण्यासाठी अनेकदा तिकीट उपलब्ध होत नसल्याने मनस्ताप सहन करावा लागत होता. गोव्यातून सुटणाऱ्या गाड्यांमध्ये सर्व स्थानकांना समान कोटा मिळावा, या मागणीसाठी जल फाउंडेशनतर्फे १५ ऑगस्ट २०२५ रोजी खेड रेल्वे स्थानकावर लाक्षणिक उपोषण करण्यात आले होते. या रेट्यामुळे कोकण रेल्वेने सकारात्मक पाऊल उचलत कोट्यात मोठी वाढ केली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

​प्रशासनाने खालील महत्त्वाच्या गाड्यांच्या आरक्षण कोट्यात बदल केला आहे. २०२५ रोजी खेड रेल्वे स्थानकावर लाक्षणिक उपोषण करण्यात आले होते. या रेट्यामुळे कोकण रेल्वेने सकारात्मक पाऊल उचलत कोट्यात मोठी वाढ केली आहे. ​या प्रमुख गाड्यांच्या जागांमध्ये झाली वाढ: ​प्रशासनाने खालील महत्त्वाच्या गाड्यांच्या आरक्षण कोट्यात बदल केला आहे: १०१०४ मांडवी एक्सप्रेस, ​२०११२ कोकणकन्या एक्सप्रेस, ​१२०५२ जनशताब्दी एक्सप्रेस, ​२२२३० वंदे भारत एक्सप्रेस, ​१०११६ मडगाव-वांद्रे एक्सप्रेस. आरक्षण कोटा वाढल्यामुळे आता रत्नागिरी, संगमेश्वर, चिपळूण, खेड, वीर, माणगाव आणि रोहा या स्थानकातून मुंबईच्या दिशेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना सहजरित्या जागा उपलब्ध होऊ शकणार आहेत. यामुळे सण-उत्सव आणि सुट्ट्यांच्या काळात होणारी प्रवाशांची ओढाताण थांबण्यास मदत होईल.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg

कोकण रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा! जल फाउंडेशनच्या आंदोलनाला यश

foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg