loader
Breaking News
Breaking News
Foto

अवकाळी पावसाने भातशेतीसह नाचणी पिकाचे नुकसान

वरवेली (गणेश किर्वे) - गुहागर तालुक्यातील भातशेतीसह नाचणी पिकाचे यावर्षी पुन्हा एकदा नुकसान झाले आहे. भातपीक कापणीला सुरुवात केल्यापासूनच परतीच्या अवकाळी पावसाने उभ्या पिकाचे नुकसान केले आहे. शेतात साचलेले पाण्याने उभ्या आणि आडव्या दोन्ही पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यात भर म्हणून सध्या जंगली श्वापदांचा, विशेषतः गवारेडे व डुकरांचा प्रचंड उपद्रव सुरू असल्याने शेतकऱ्यांची डोकेदुखी अधिकच वाढली असून ग्रामीण भागातला शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे. भात शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे भात पीक कापणी नंतर ते या पावसाने भिजत असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

पावसाच्या सरींमुळे भात भिजून दाण्याचा दर्जा घसरत आहे. अनेक शेतकऱ्यांनी कापणी सुरू केली असतानाच पाऊस आला, परिणामी अनेक ठिकाणी भातपिके शेतातच पडून राहिली आहेत. डोंगरपायथ्याच्या आणि पाणवट्याच्या शेतांमध्ये पाणी साचून अनेक ठिकाणी कापलेली भातपिके शेतातच पडून आहेत. भात व नाचणीचे पीक पूर्णपणे नष्ट झाल्याचे दृश्य दिसत आहे. त्यात रात्रीच्या वेळी जंगली रानडुकरांचे कळप शेतात धुडगूस घालून तयार पिकाचे नुकसान होत असून दुसकीकडे पाणी तुंबलेल्या शेतातच कापणी करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.डुकरांचे कळप शेतात घुसून उरलेसुरले पीक नष्ट करत असल्याने शेतकरी अक्षरशः हतबल झाले आहेत. शेतात पहारा देऊन बसलेले शेतकरी आता प्रशासनाकडे मदतीची आणि उपाययोजनेची मागणी करत आहेत. संपूर्ण हंगामभर कष्ट करुन पीक आले, पण आता पाऊस आणि डुकरांच्या त्रासामुळे सर्व परिश्रम वाया गेले, अशी हताश प्रतिक्रिया शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहेत. शेतकऱ्यांच्या नुकसानीचा पंचनामा करून तातडीने मदत मिळावी, तसेच गवा रेडे व डुक्करांच्या वाढत्या उपद्रवावर वनविभागाने नियंत्रण आणावे, अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg