loader
Breaking News
Breaking News
Foto

महाराष्ट्राला दुहेरी फटका, पुण्यासह या जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा अलर्ट तर नागपूरसह या जिल्ह्यांत उष्णतेची लाट

मुंबई - राज्यात मागील काही दिवसांपासून उन्हाच्या झळा खूप तिव्र झाल्या आहेत. विशेषतः विदर्भात सुर्य आग ओकत आहे. या भागातील तापमानात मोठी वाढ झाली आहे. वर्धा आणि अमरावती येथे सर्वाधिक (44.4) तापमानाची नोंद दिसून येत आहे. तर, दुसरीकडे पुण्यासह अनेक जिल्ह्यात मुसळधार पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे. पुढील पाच दिवस हे वातावरण्यात विविध बदल दर्शवत आहेत. विदर्भात उष्णतेचा लाटेचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. तर मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा अलर्ट आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, नांदेड, लातूर, धाराशीव या जिल्ह्यांना वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. अकोला, अमरावती, चंद्रपूर, नागपूर, वर्धा, वाशिम या जिल्ह्यांत उष्णतेचा लाटेचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. राज्यावर अँटी-सायक्लोनिक सर्क्युलेशन तयार झाल्यामुळे आकाश स्वच्छ असून सूर्यप्रकाश थेट जमिनीवर पडत आहे. त्यामुळे तापमान झपाट्याने वाढत आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg