loader
Breaking News
Breaking News
Foto

महावितरणचा वसूलीचा सपाटा

रत्नागिरी: मार्च महिना संपत आल्याने महावितरणने रत्नागिरी विभागातील थकीत वीज बिल वसुलीसाठी अत्यंत आक्रमक पवित्रा घेतला आहे. याचा मोठा फटका रत्नागिरी, राजापूर, लांजा आणि संगमेश्वर या तालुक्यातील सामान्य वीज ग्राहकांना बसत आहे. या विभागात महावितरणचे एकूण १,९५,०२० ग्राहक असून त्यांच्याकडून प्रशासनाला साधारण २८ कोटी रुपयांचे वीज बिल येणे अपेक्षित आहे. मात्र, आतापर्यंत केवळ ११ कोटी रुपयांची वसुली झाली असून अद्याप १७ कोटी रुपयांची थकबाकी शिल्लक आहे. हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी महावितरणने सध्या वसुलीचा जोरदार तगादा लावला आहे. ​या मोहिमेत नियमित वीज बिल भरणाऱ्या ग्राहकांनाही विनाकारण त्रासाला सामोरे जावे लागत असल्याच्या तक्रारी वाढत आहेत. नियमानुसार, एका महिन्याचे बिल थकले की दुसऱ्या महिन्यात ते एकत्रित येते आणि ते भरण्यासाठी ठराविक मुदत दिली जाते. परंतु, राजापूर आणि संगमेश्वरच्या ग्रामीण भागात ही मुदत संपण्यापूर्वीच महावितरणचे कर्मचारी वीज कनेक्शन खंडित करत असल्याचे समोर येत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

धक्कादायक बाब म्हणजे, वीज कापल्यानंतर जुना मीटर काढून नवीन मीटर बसवण्याची सक्ती केली जात असल्याने लांजा आणि रत्नागिरी परिसरातील ग्राहकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. ​आतापर्यंत महावितरणने या विभागातील १७०० कनेक्शन खंडित केली आहेत. त्यापैकी ११०० ग्राहकांनी तातडीने पैसे भरल्यामुळे त्यांचा वीज पुरवठा पुन्हा सुरू करण्यात आला, मात्र ६०० ग्राहक अजूनही अंधारात आहेत. हे ग्राहक इतर ठिकाणाहून वीज चोरी करून वापरत नाहीत ना, हे तपासण्यासाठी महावितरणने विशेष पथकेही तैनात केली आहेत. एकीकडे सर्वसामान्यांवर ही कठोर कारवाई होत असताना, दुसरीकडे विभागातील शासकीय कार्यालयांकडे तब्बल ८ कोटी रुपयांची थकबाकी आहे. तरीही या कार्यालयांचा वीज पुरवठा खंडित करण्याचे धाडस अधिकारी दाखवत नसल्याने महावितरणच्या दुटप्पी भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

टाईम्स स्पेशल

​तसेच ५००० रुपयांच्या वरची बिले ऑनलाइन भरण्याची सक्ती केली जात आहे. राजापूर आणि लांजा सारख्या ग्रामीण भागात दुपारनंतर बँका बंद होत असल्याने ग्राहकांना बिल भरता येत नाही आणि परिणामी त्यांना रात्र अंधारात काढावी लागत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर, आज शनिवार २१ मार्च रोजी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत महावितरणचा आढावा घेणार आहेत. या बैठकीत पालकमंत्री राजापूर ते संगमेश्वरपर्यंतच्या त्रस्त जनतेच्या तक्रारींची दखल घेऊन अधिकाऱ्यांना समज देणार की वसुलीचे समर्थन करणार, याकडे संपूर्ण विभागाचे लक्ष लागले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg