loader
Breaking News
Breaking News
Foto

राजगंगा नदीवरील पूल ठरला विकासाचा नवा दुवा

संगमेश्वर (सत्यवान विचारे) - मौजे चिखली धनवडेवाडी येथील राजगंगा नदीवरील बहुप्रतिक्षित पुलाचे उद्घाटन चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदारसंघाचे आमदार शेखर निकम यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले. ग्रामस्थांच्या अनेक वर्षांच्या संघर्षाला आणि सातत्यपूर्ण मागणीला अखेर न्याय मिळाल्याने परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

गेली तब्बल ४० वर्षे या पुलाअभावी चिखली व परिसरातील नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. विशेषतः पावसाळ्यात राजगंगा नदी दुथडी भरून वाहत असल्याने विद्यार्थ्यांचे शिक्षण, शेतकऱ्यांची वाहतूक, नागरिकांचे दैनंदिन व्यवहार तसेच आपत्कालीन आरोग्य सेवा यांवर मोठा परिणाम होत होता. अनेक वेळा जीव धोक्यात घालून नदी पार करण्याची वेळ ग्रामस्थांवर येत होती. हा प्रश्न केवळ दळणवळणाचा नव्हता, तर ग्रामस्थांच्या सुरक्षिततेचा आणि विकासाचा प्रश्न होता. ग्रामस्थांच्या या भावना लक्षात घेत आमदार शेखर निकम यांनी शासन दरबारी सातत्याने पाठपुरावा करून या पुलासाठी साकाव कार्यक्रम अंतर्गत निधी मंजूर करून आणला. त्यांच्या प्रयत्नांमुळे अखेर हा पूल पूर्णत्वास आला असून आता चिखलीसह परिसरातील गावांचा संपर्क अधिक सुलभ होणार आहे. पुलामुळे विद्यार्थ्यांना, शेतकऱ्यांना, महिलांना तसेच ज्येष्ठ नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून ग्रामीण विकासाच्या दृष्टीने हा पूल महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.

टाइम्स स्पेशल

याचबरोबर पुलाच्याजोड रस्त्यांची आवश्यकता लक्षात घेऊन आमदार शेखर निकम यांनी १५ लाख रुपयांचा निधी मंजूर केला असून त्या कामाचे भूमिपूजनही यावेळी करण्यात आले. त्यामुळे ग्रामस्थांनी समाधान व्यक्त करत आमदार निकम यांचे आभार मानले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg