दोडामार्ग (प्रतिनिधी) - दोडामार्ग तालुका हत्ती मुक्त करा, यासाठी ठिय्या आंदोलन करण्यात आले. संबंधित वन अधिकारी यांनी जंगली हत्ती कळपाला जंगलात रोखून ठेवण्यासाठी प्रयत्न केले जातील असे सांगितले, दिवसा ठिक पण राञीच्या वेळी हत्ती कळपाला रोखण्यासाठी वन विभागाचे प्रयत्न निष्फळ ठरले आणि कळपाने बाबर्डे गावात प्रवेश करुन शेती बागायती, अननस बागायतीमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान केले यामुळे शेतकरी वर्गात संताप व्यक्त केला जात आहे. शेतकर्यांचा संयमाचा बाण तुटण्याच्या मार्गावर आहे, अशी माहिती शेतकरी दत्ताराम देसाई यांनी दिली.
काल रात्री दोडामार्ग तालुक्यातील बाबर्डे गावामध्ये तुकाराम गावडे यांच्या शेतीत बाहुबली हत्तीने अक्षरशः धुडगूस घातला. चारपाच वर्षे अहोरात्र कष्ट करून वाढवलेली नारळ, सुपारी, केळी, अननस आदी पिके एका रात्रीत जमीनदोस्त झाली आहेत. संपूर्ण शेत नासधूस झाले असून हे दृश्य अत्यंत विदारक आहे. या घटनेमुळे शेतकरी कुटुंब मानसिकदृष्ट्या पूर्णतः कोलमडले आहे. सर्वात गंभीर बाब म्हणजे, अशा घटना वारंवार घडत आहेत. त्यामुळे संतप्त शेतकर्यांमध्ये तीव्र रोष निर्माण झाला आहे.


































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.