loader
Breaking News
Breaking News
Foto

तिलारी खोर्‍यातील जंगली हत्तींना त्यांच्या अधिवासात सोडण्यासाठी सरपंच सेवा संघटनेचे वन कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू

दोडामार्ग (प्रतिनिधी) - गेल्या २३ वर्षापासून दोडामार्ग तालुक्यातील तिलारी खोर्‍यातील अनेक गावात जंगली हत्ती धुमाकूळ घालत आहेत. होणार्‍या नुकसानामुळे शेतकरी हैराण झाले आहेत. हत्ती पकड मोहीम राबवून हत्तींना त्यांच्या आदिवासात सोडा असे आदेश होऊन देखील तसेच हत्ती बाबत काय उपाययोजना नियोजन याबाबत बेंगलोर येथे दौरा झाला. याचा अहवाल देखील राज्य सरकारला सादर केला नाही. तेव्हा कोणत्याही परिस्थितीत हत्ती पकड मोहीम राबवावी यासाठी शेतकरी सरपंच सेवा संघटना यांनी दोडामार्ग वन कार्यालय येथे ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

हत्ती उपद्रव वाढत चालला आहे. गेल्या वर्षी मोर्ले गावात ओंकार हत्ती याने एक बळी घेतला यानंतर हत्ती पकड मोहीम बाबत आदेश झाले. पण न्यायालयात याचिका दाखल केली यामुळे हत्ती पकड मोहीम राबवली नाही, असे वन अधिकारी सांगत आहेत. मात्र न्यायालयाने हत्तींना इजा न होता सुरक्षित त्यांच्या आदिवासात सोडा असे म्हटले आहे. याचिका दाखल केली ती फक्त ओंकार हत्ती याला वनतारा मध्ये पाठवायला विरोध केला आहे. हत्ती पकड मोहीम राबवली जाऊ नये यासाठी नाही. पण वन विभाग न्यायालयाचे नाव सांगून पळवाट काढत आहेत. असा आरोप केला जात आहे. हत्ती पकड मोहीम राबवली जावी यासाठी ठिय्या आंदोलन मध्ये सरपंच सेवा संघटना अध्यक्ष प्रविण गवस, दोडामार्ग काजू बागायतदार संघटना अध्यक्ष संजय देसाई, सरपंच साक्षी देसाई, राजाराम देसाई इतर उपस्थित आहेत. हत्ती पकड मोहीम राबवली पाहिजे अशी मागणी लावून धरली आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg