कणकवली (प्रतिनिधी) - प. पू. परमहंस भालचंद्र महाराज यांच्या १२२ व्या जन्मोत्सवाच्या पार्श्वभूमीवर संस्थानच्यावतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. विशेष बाब म्हणजे महाराजांच्या जन्मवर्षाशी साधर्म्य साधत तब्बल १२२ रक्तदात्यांनी रक्तदान करून समाजप्रती आपले योगदान दिले. या रक्तदान शिबिराचे उद्घाटन संस्थानचे अध्यक्ष सुरेश कामत यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले. या उपक्रमाला रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. मानवतेच्या भावनेतून बाबांच्या चरणी ही सेवा म्हणून रक्तदान करत भविकांनी या शिबिरातून संदेश दिला.
यावेळी संस्थानचे खजिनदार दादा नार्वेकर, सेक्रेटरी निवृत्ती धडाम, विश्वस्त प्रसाद अंधारी, गजानन उपरकर, नागेश मुसळे, संस्थानचे व्यवस्थापक विजय केळूसकर, प्रा. दिवाकर मुरकर, डॉ. विद्याधर तायशेटे, सभासद उमेश वाळके, सोमनाथ खेडेकर, अँड. प्रवीण पारकर, चेतन अंधारी, विजय राणे, श्रीरंग पारगावकर आदी मान्यवर उपस्थित होते. रक्तदान हेच श्रेष्ठ दान असून अशा उपक्रमांतून समाजात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते, असे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.


























































































































































































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.