loader
Breaking News
Breaking News
Foto

अंत्रवली गावचे मिलिंद जाधव यांचे निधन

देवरुख: संगमेश्वर तालुक्यातील अंत्रवली बौध्दवाडीतील मुंबईस्थित मिलिंद बाबु जाधव यांचे अल्पशा आजाराने दुख:द निधन झाले. त्यांच्या जाण्याने जाधव परिवारावर शोककळा पसरली आहे. ते ५९ वर्षांचे होते. अंत्रवली संबोधी संघदिप संस्थेचे ते क्रियाशील सभासद होते. ते एक क्रिकेट पट्टू, बुलबुल, कॅशिओ, बेंजो वाद्यांमध्ये पारंगत होते. त्यांना शरीर सौष्ठवामध्ये विशेष आवड होती. मिलिंद जाधव यांना ग्रामीण जीवनशैलीत विशेष आवड होती. गेली अनेक वर्षे ते एसी मॅकनिक म्हणुन ते कार्यरत होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

मुंबईमध्ये एसी मॅकनिक म्हणुन कार्यरत असताना ते स्वत: कॉन्ट्रक्ट घेत होते. १५ ते २० कुशल कर्मचारी त्यांच्या हाताखाली काम करत होते. जाधव यांचे वडिल निवृत्त सैनिक होते. गेल्या २१ डिसेंबर रोजी रात्री उशीरा त्यांची तब्ब्येत अचानक बिघडली. त्यांना तात्काळ रुग्नालयात हलविण्यात आले. आठ दिवस त्यांच्यावर सायन येथील रुग्णालयात उपचार सुरु होते. आठ दिवस ते व्हेंटीलेटवर होते. आठ दिवस मृत्युशी झुंज देत २८ डिसेंबर रोजी त्यांची प्राणज्योत मालवली. करंबेळे येथील सामाजिक कार्यकर्ते सिताराम मोहिते यांचे ते जावई होत. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, भाऊ, भावजय, पुतणे, बहिणी असा परिवार आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg