loader
Breaking News
Breaking News
Foto

मानवता फाउंडेशन ने जपली सामाजिक बांधिलकी

कळंबोली - नवी मुंबईतील मानवता फाउंडेशन हा सामाजिक उपक्रमातून सामाजिक हित जपणारा एक फाउंडेशन आहे. दरवर्षी समाजातील गोरगरीब, गरजू व दिन दुबळ्या वंचित घटकापर्यंत सामाजिक सेवा पोचवण्याचा ते प्रयत्न करीत असतात. या वर्षी अक्षय तृतीयाचे निमित्ताने अन्नदान उपक्रमांतर्गत अन्नदान व सामाजिक सेवा देण्याचा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमाला आदिवासी बांधवांकडून उस्फूर्त प्रतिसाद मिळाला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

मानवता फाउंडेशन कडून "अन्नदानम" प्रोजेक्ट मार्फत खारघर आदिवासी पाड्यावर आदिवासी बांधवाना अन्नदान करण्यात आले. त्या वेळी मानवता फाउंडेशन चे अध्यक्ष संजय पवार, उपाध्यक्ष विनोद नायर, विकी मेगणी, टिपू पटवेगर, चेतन कदम, नंदनी सिंग, तुषार डीकुळे, आफताब आलम, विघ्नेश नारायांकर, सुरज दुबे, रोहन परदेशी आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg