loader
Breaking News
Breaking News
Foto

वरवेली गावचे सुपुत्र, सर्पमित्र प्रसाद विचारे यांचा ग्रा.पं.च्यावतीने सत्कार

वरवेली (गणेश किर्वे) - गुहागर तालुक्यातील वरवेली गावचे सुपुत्र, सामाजिक कार्यकर्ते, कला-क्रीडा-सांस्कृतिक-शैक्षणिक क्षेत्रात काम करणारे, सर्पमित्र प्रसाद अर्चना अरविंद विचारे यांना वर्ल्ड फॉर नेचर इंडिया, शाखा रत्नागिरी यांचेवतीने दिला जाणारा पहिला राज्यस्तरीय सह्याद्री रत्न निलेश बापट आदर्श वन्यजीव रक्षक पुरस्कार-२०२५ प्रदान करण्यात आला होता. प्रसाद विचारे यांना मिळालेल्या राज्यस्तरीय पुरस्कारामुळे वरवेली गावाचे नाव राज्यस्तरापर्यंत पोहोचल्याने वरवेली ग्रामपंचायतच्यावतीने सरपंच नारायण आगरे यांच्या हस्ते प्रसाद विचारे यांचा सत्कार करण्यात आला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी उपसरपंच मृणाल विचारे, ग्रामपंचायत सदस्य नरेश रांजाणे, अरुण रावणंग, माजी सरपंच चंद्रशेखर विचारे, सुप्रिया देसाई, पुनम रावणंग, पत्रकार गणेश किर्वे,ग्रामपंचायत अधिकारी महेंद्र भुवड यांच्यासह सर्व कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी सत्कार प्रसंगी बोलताना प्रसाद विचारे यांनी सांगितले की, हा पुरस्कार माझा एकट्याचा नसून माझ्यासोबत कायम असणार्‍या सर्वांचाचं आहे. खरे हक्कदार ते आहेत. मग ते प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष, मुंबई, गावं किंवा प्रशासकीय अधिकारी, मित्र मंडळी, नातेवाईक असतील किंवा विविध क्षेत्रातून मिळणार्‍या पाठिंब्यामुळे हें शक्य झाले कारण माझ्या काळजीपोटी आणि वन्यजीवांच्या बचावासाठी सदैव माझ्यासोबत असतात आणि असेच सवार्ंनी नेहमीच पाठिंबा द्या, असेही प्रसाद विचारे यांनी सांगितले.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg