loader
Breaking News
Breaking News
Foto

लांजा शहरातील श्रीराम मंदिर पूलाचे काम पावसाळ्याआधी न झाल्याने नागरिकांत नाराजी

केळंबे-लांजा (सिराज नेवरेकर) - मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम बरीच वर्ष सुरु आहे. लांजा शहरातील श्रीराम मंदिर नजिकच्या पुलाचे काम पावसाळयाआधीच पूर्ण होणे आवश्यक असताना ते अर्धवट स्थितीत असल्याने यंदा पावसाचा जोरदार फटका बसला. पुलानजिकच्या घरात दोन वेळा पाणी शिरुन नुकसान होण्याची घटना घडली. हाहाकार उडाल्याने जनतेतून नाराजी व्यक्त केली जात आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

शहरातील पावसाळ्याआधीच रस्ता करण्याची मागणी जनतेतून केली जात होती. तसेच पुलाचे काम पूर्ण करण्याची मागणी होती परंतु पावसाळ्यापूर्वी काम पूर्ण न झाल्यामुळे यंदाच्या पावसाळ्यात जनतेला नाहक त्रासाला सामोरे जावे लागले. यावर्षी पावसाच्या सुरुवातीला आणि परतीच्या पावसामुळे दोन वेळा वहाळात तुंबलेले पाणी घरात शिरून नुकसान झाले. लांजा शहरातील उड्डाण पुलाचे काम सुरू आहे. पुलाचे काम अर्धवट स्थितीत आहे. त्यामुळे माती, सामान इतरत्र अस्ताव्यस्त पडलेले आहे. सर्व्हिस रस्ते पूर्ण नाहीत. रस्त्यावरील पडलेले खड्डे यातून वाट काढत रस्त्यावरुन मार्गक्रमण करावे लागत असल्याने जनतेतून नाराजी व्यक्त केली जात आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg